Friday, November 23, 2007

मग परदेशी महिलांना प्रवेश कसा?

गोव्यातील मंगेशीच्या मंदिरात काही पर्यटक आपली पादत्राणे हातातील पिशवीत दडवून मंदिरात शिरतात त्याचे काय? केरळमधील साबरीमलाच्या अय्यप्पा मंदिरात ११ ते ५५ वयोगटातील स्त्रियांना प्रवेश मिळत नाही. रजस्वला स्त्रीने मंदिरात येऊ नये यासाठी हा नियम आहे. याउलट मंगेशीच्या मंदिरात स्त्रिया, वयात आलेल्या विद्याथिर्नींचे थवेच्या थवे सहल म्हणून येतात. तसेच गौरवणीर्य परदेशी पर्यटक महिलांसुद्धा मोठ्या संख्येने येथे भेट देतात. यात काही रजस्वला असणे शक्य आहे. मूतिर्पूजा पाहण्यासाठी गोमांस भक्षण करून आलेली विदेशी, गौरवणीर्य व परधमीर्य महिला हातात चामड्याच्या पट्ट्याचे घड्याळ व कमरेला चामड्याचा पट्टा बांधून आणि हातात चामड्याची पर्स घेऊन मंगेशीच्या मंदिरात शिरू शकते; पण भक्तिभावाने श्री मंगेशाच्या दर्शनाला जाऊ इच्छिणाऱ्या अपंगांना प्रवेश नाकारला जातो, याला काय म्हणावे?

शां. मं. गोठोसकर, वडाळा.

Monday, October 1, 2007

अतिसार्मथ्यशाली महिलांची सदोष यादी

शां. मं. गोठोसकर

'फोर्ब्स' पाक्षिकाने विविध क्षेत्रांतील सर्वात प्रभावशाली महिलांची यादी जाहीर करताना लावलेल्या मोजपट्ट्या सदोष आहेत. राजकारणी महिलांच्या यादीत जर्मनीच्या चॅन्सेलर अॅन्जेला मरकेल यांचा पहिला तर चीनच्या उपपंतप्रधान वू यी या दुसऱ्या स्थानावर आहेत. मात्र मायावतींचा या यादीत समावेश नाही, तर सोनियांना चौथा क्रमांक दिला आहे.

.......

अमेरिकेत 'फोर्ब्स' नावाचे पाक्षिक आथिर्क जगतात सुप्रतिष्ठित आहे. १० लाख खपाच्या या नियतकालिकाच्या १७ सप्टेंबरच्या अंकात 'जगातील १०० अतिसार्मथ्यशाली महिला' या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यातील ६६ व्यक्ती अर्थ-व्यापार-उद्योग क्षेत्रातील असून, २६ राजकारणी आहेत. बाकीच्या आठ महिला न्यायाधीश, संयुक्त राष्ट्रांतील अधिकारी, सरकारी अधिकारी, पत्रकार आदी आहेत. उर्वरित क्षेत्रांतील महिला शक्तिशाली नसतात, असे या पाक्षिकाने गृहीत धरलेले दिसते. अशा या सरमिसळीत त्यांचे क्रमांक लावण्यात आले आहेत. त्यासाठी वापरलेल्या मोजपट्ट्या सदोष वाटतात. विविध प्रकारची फुले, फळे व भाज्या एकत्र करून त्यांना क्रमांक देणे जसे चुकीचे होईल, तसा 'फोर्ब्स'चा हा सारा उपद्व्याप दिसतो.

राजकारणी व्यक्तीचा क्रमांक तिच्या राजकीय ताकदीनुसार लावला पाहिजे. त्याऐवजी त्या राजकीय नेत्याचे आथिर्क महत्त्व काय हे 'फोर्ब्स' प्रामुख्याने लक्षात घेते. ते अर्थ- व्यापार- उद्योग यांना वाहिलेले असल्यामुळे त्यांनी तसा विचार करायला हरकत नाही. तथापि, त्याप्रमाणे क्रमांक लावणे साफ चूक आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर (म्हणजे पंतप्रधान) अॅन्जेला मरकेल यांना या यादीत पहिला क्रमांक आहे. जगात त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार अमेरिका व जपान यांच्यानंतरचा असून, सर्व प्रकारच्या वस्तूंच्या निर्यातीत पहिला क्रमांक आहे. जी-८ ही संपन्न राष्ट्रे व युरोपियन युनियन यांच्या बैठकांमध्ये अॅन्जेलाबाई सर्वाधिक प्रभावीपणे काम करीत असल्याने त्यांना पहिला क्रमांक देण्यात आला आहे. जगाच्या राजकारणात संबंधित राष्ट्राची दंडशक्ती व शस्त्रास्त्रांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात त्या राष्ट्राचा हिस्सा या बाबींचा आधी विचार होतो. यामुळे रशिया, चीन, फ्रान्स व ब्रिटन यांच्या अर्थव्यवस्थांचे आकार जर्मनीहून लहान असूनही त्या राष्ट्रांना अधिक महत्त्व दिले जाते.

खुद्द जर्मनीत अॅन्जेलाबाईंची राजकीय ताकद केवढी आहे हे पाहू. दोन वर्षांपूवीर् त्या राष्ट्रात संसदेची निवडणूक झाली तेव्हा त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. मग या बाईनी आवळ्याभोपळ्याची मोट बांधून संमिश्र सरकार बनविले. त्यासाठी त्यांना तब्बल दोन महिने मेहनत घ्यावी लागली. बहुजन समाज पक्षाच्या सवेर्सर्वा व उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्याशी राजकीय ताकदीबाबत तुलना केली तर अॅन्जेलाबाईंचा क्रम खालीच येतो. उत्तर प्रदेशची लोकवस्ती जर्मनीच्या दुपटीहून अधिक आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत बसपला निर्णायक बहुमत मिळाले. त्या सभागृहात सरकार पक्षावर मायावतींची पूर्ण हुकमत चालते. जर्मन संसदेत अॅन्जेलाबाईंची तशी ताकद नाही. तरीही 'फोर्ब्स'च्या यादीत मायावती नाहीत!

मायावतींची ताकद पुरी जाणण्यासाठी प्रथम उत्तर प्रदेशचे महत्त्व लक्षात घ्यावयास हवे. जगात भारत वगळता फक्त चार राष्ट्रे लोकवस्तीने उत्तर प्रदेशहून मोठी आहेत. भारतातील २८ राज्यांपैकी लोकवस्तीने शेवटच्या १६ राज्यांच्या बेरजेएवढी एकट्या उत्तर प्रदेशची लोकसंख्या आहे. आतापर्यंतच्या १३ पंतप्रधानांपैकी आठ जण उत्तर प्रदेशचे होते. पण १२ राष्ट्रपतींपैकी एकही उत्तर प्रदेशचा नव्हता. खरी सत्ता आपल्या हाती राहावी या दिशेने उत्तर प्रदेशचे राजकारण होत राहिले. पंतप्रधानपदाच्या आतापर्यंतच्या ६१ वर्षांपैकी ४९ वषेर् हे पद या राज्याच्या होती राहिले. भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेशचा दबदबा विशेष असण्याची ही कारणे आहेत.

उत्तर प्रदेशच्या आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये केवळ स्वबळावर हे पद मिळविणाऱ्या मायावती पहिल्याच होत. लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या तर नवीन सरकार कोणाचे हे ठरविण्याएवढे मायावतींचे खासदार असतील आणि मग त्याच पंतप्रधान होतील, असा कित्येक राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. असे असूनही 'फोर्ब्स'च्या यादीत त्यांना स्थान देण्यात आलेले नाही. खरे म्हणजे त्यातील १५ जणी तर मायावतींपुढे नगण्य आहेत. चीनच्या उपपंतप्रधान वू यी या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हुकूमशाही राष्ट्रातील राजकारण्यापेक्षा लोकशाहीतील अशा व्यक्तीची ताकद बरीच अधिक समजणे गरजेचे आहे. हे लक्षात घेता त्या यादीतील राजकारण्यांमध्ये सोनिया गांधींना चौथा क्रमांक दिला ही चूकच समजली पाहिजे. अन्जेला व वू यी यांच्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कंडोलिझा राइस आहेत. सोनिया गांधींनंतर फ्रान्सच्या गृहमंत्री व अर्थमंत्री यांना स्थान आहे. मग इंग्लंडच्या राणीसाहेबांचा क्रमांक आहे. अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमॉक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना नंतरचे स्थान दिलेले आहे. या यादीतील पुढच्या राजकारण्यांचा विचार करण्याची खरोखर गरज नाही. जगाच्या राजकारणाचा विचार करता 'फोर्ब्स'ची यादी निरर्थक समजली पाहिजे, असा या साऱ्याचा अर्थ आहे.

या निमित्ताने भारतामध्ये राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाणाऱ्या प्रमुख राजकारणी महिला कोण हे पाहू. सोनिया व मायावती यांच्यानंतर अण्णादमुकच्या सवेर्सर्वा जयललिता यांना स्थान द्यावे लागेल. मग क्रमांक लागतो तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनजीर् यांचा. नंतर येतात. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे व भाजप नेत्या सुषमा स्वराज. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित व पंजाब काँग्रेसच्या अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल यासुद्धा महत्त्वाच्या राजकारणी आहेत. उमा भारतींनी भाजपचा त्याग केलेला असला तरी सभांना गदीर् खेचण्याची त्यांची ताकद कायम आहे. मार्क्सवादी नेत्या वृंदा करात यांनी आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. काश्मीरमधील पीपल्स डेमॉक्रॅटिक फ्रंटच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती अजूनही तेथे प्रभावी आहेत. यापैकी पाच-सहा जणींना पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे हे विशेष होय.

आता प्रमुख मराठी राजकारणी महिलांचा विचार करू. शालिनीताई पाटील यांच्या सभांना गदीर् होते. उपदवक्षमता हासुद्धा राजकीय ताकदीचा एक भाग असतो. त्यामुळे शालिनीताईंनी दौरा जाहीर केला की, त्यांना जिल्हाबंदी लागू होते. केंदीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यासुद्धा सभा जिंकतात. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष प्रभा राव यांचे स्थान शाबूत राहिल्यामुळे सध्या त्या खूष आहेत. भाजपमधून राष्ट्रवादीत आल्यानंतरही विमल मुंदडांनी बीड जिल्ह्यातील आपला गड शाबूत राखला आहे. शोभाताई फडणवीस आपला पूर्व विदर्भातील प्रभाव टिकवून आहेत. शिवसेनेकडे नीलम गोऱ्हे वगळता महिला चेहरा फक्त खासदार कल्पना नरहिरे आणि भावना गवळी यांचा आहे. युवासाखरसम्राज्ञी रश्मी बागल यांची दखल घेतलीच पाहिजे. करमाळा तालुक्यात त्यांच्याकडे असलेल्या दोन्ही साखर कारखान्यांमध्ये गेल्या हंगामात एकूण साडेतेरा लाख पोती उत्पादन झाले. या मोजपट्टीनुसार महाराष्ट्रातील साखरसम्राटांचे क्रमांक लावले तर रश्मीपेक्षा मोठे फक्त आठ आढळतात. माजी खासदार रजनी पाटील महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्षपद मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याने आपली ताकद त्यानी श्रेष्ठींना पटवून दिलेलीच असावी. विद्या चव्हाण यांनी सामान्यांसाठी यशस्वी झगडा देण्याचे काम आता राष्ट्रवादीतून चालविले आहे.

लोकसभा-विधानसभांमध्ये ३३टक्के आरक्षणाची महिलांची प्रलंबित मागणी, भाजपने महिलांना पक्षात तेवढी स्थाने देण्याचा घेतलेला निर्णय आणि सुयोग्य महिलांना प्रशिक्षित करून त्यांना राजकारणात आणण्याचा टाइम्स ऑफ इंडियाच्या लीड इंडिया सेलचा उपक्रम यांमुळे लवकरच राजकारणी महिलांची संख्या बरीच वाढेल. मग त्यांचा शोध घेण्यासाठी लेखाचा प्रपंच करावा लागणार नाही.

Wednesday, July 11, 2007

शेखावतांच्या तुलनेत प्रतिभाताई हे कमी संकट!

शां. मं. गोठोसकर

काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांच्यावर दबाव आणण्यासाठी भैराँसिंह आपली संपत्ती जाहीर करणार आहेत, असे भाजपने जाहीर केले आहे. मग शैक्षणिक पात्रता किती, हेही सांगण्याचा आग्रह भाजप का धरीत नाही?

आपल्या देशात सरकारी व निमसरकारी कार्यालयांमध्ये चपराशाच्या नोकरीसाठी किमान शैक्षणिक पात्रता एसएससी आहे. तथापि, जेमतेम आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या एका इच्छुकाने चक्क राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याचे नाव आहे भैराँसिंह शेखावत! या पदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ते 'अपक्ष' उमेदवार आहेत.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जावर इच्छुकाची संपत्ती नमूद केली पाहिजे अशी अट अलीकडच्या काळात घालण्यात आली. कालांतराने, शैक्षणिक पात्रतासुद्धा लिहिली पाहिजे, अशी शर्त जोडण्यात आली. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांच्यावर दबाव आणण्यासाठी भैराँसिंह आपली संपत्ती जाहीर करणार आहेत, असे भाजपने जाहीर केले आहे. मग शैक्षणिक पात्रता किती हे सांगण्याचा आग्रह भाजप का धरीत नाही? प्रतिभाताई अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांच्या एम. ए. असून त्यांच्याकडे कायद्याचीही पदवी आहे. राष्ट्रपतीपदासाठी किमान शैक्षणिक पात्रता किती हे नेमून दिलेले नसले तरी प्रतिभाताईंकडे किमान आवश्यक त्याहून ती अधिक आहे आणि भैराँसिंहांकडे तर मुळीच नाही हे यावरून लक्षात येते.

भैराँसिंहंाची अन्य पात्रताही येथे तपासणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजस्थानातील जयपूर संस्थानात सिकर हे उपसंस्थान होते. तेथे १९४५ साली भैराँसिंहांची पोलिस सबइन्स्पेक्टर म्हणून नेमणूक झाली. बाहेरून येणाऱ्या मिठावर सिकरचे सरकार कर आकारत असे. पोलिसांनी तो गोळा करायचा आणि सरकारी तिजोरीत भरायचा अशी पद्धत होती. सिकरचा रावराजा कल्याणसिंह एकदा रस्त्यावरून जात असताना उंटावरून मीठ नेणारा काफिला त्याला दिसला. कर भरल्याच्या पावत्या दाखवा, असे त्याने फर्मावले. ते मीठ व्यापारी म्हणाले, आम्ही कर भरला, पण पावत्या देण्यात आल्या नाहीत. यावर भैराँसिंहांना तात्काळ बडतर्फ करण्यात आले. ही गोष्ट त्यावेळच्या जयपूरच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती.

सिकर येथे राधामोहन माथूर नावाचे एक बडे सरकारी अधिकारी होते. बडतफीर्नंतर भैराँसिंह त्यांच्या वाड्यावर राहत असत. पाच-सहा महिन्यांनंतर राधामोहन रावराजांना भेटले आणि भैराँसिंहांना परत नोकरीवर घेण्याची विनंती केली. भ्रष्ट माणसाबद्दल असे सांगणेसुद्धा तुम्हाला शोभत नाही, असे रावराजा म्हणाले. त्यावर राधामोहन उत्तरले, ''बडतर्फ झाल्यापासून मीच त्याला पोसत आहे. त्याला पुन्हा कामावर घेतला, तर माझ्यावरचा भार कमी होईल.'' त्यावर भैराँसिंहांना परत नोकरीवर घेण्यात आले, पण त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली. एक वर्षानंतर त्यांनी राजीनामा दिला.

राधामोहन यांचे धाकटे भाऊ ब्रजमोहन हे पूर्वी मुंबईत 'टाइम्स ऑफ इंडिया'त नोकरीला होते. पुढे ते संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफ संघटनेत काम करायचे. निवृत्तीनंतर ते सिकरला आपल्या वाड्यात राहतात. अलीकडेच एका इंग्रजी साप्ताहिकाचे प्रतिनिधी नीलम मिश्रा हे नुकतेच त्यांना भेटले. ब्रजमोहननी हे सारे मिश्रांना सांगितले. ते म्हणाले, ''जेव्हा भैराँसिंहांचा उल्लेख होत असे, तेव्हा प्रत्येक वेळी राधामोहन ही सारी कथा पुन्हा सांगत असत.''

हे सारे खोटे आहे, असे काहीसुद्धा झालेले नाही, असे भाजप नेत्या सुषमा स्वराज निक्षून सांगत असतात. तेथील डीएसपीने दिलेल्या पत्राचा त्या हवाला देतात. तसे ते असेलही, पण रावराजाने बडतफीर्च्या हुकुमावर कारण लिहिले पाहिजे, असे त्यांच्यावर आत्तासारखे मुळीच बंधन नव्हते. नोकरीत खंड पडला होता, हे त्या डीएसपीने नाकारलेले नाही. महात्मा गांधी व भैराँसिंह यांच्यामध्ये साम्य एवढेच की दोघांनीही मिठावरचा कर भरलाच नाही. फरक एवढाच की गांधीजींनी तो दिलाच नाही आणि भैराँसिंहांनी मिळालेला कर सरकारी तिजोरीत न भरता तो आपल्या खिशात घातला!

भैराँसिंहांचे जावई नरपतसिंह राजवी राजस्थानात एक मंत्री आहेत. त्यांचे वडील तहसिलदार होते. राजस्थान कॅनाल (म्हणजेच इंदिरा गांधी कॅनाल) या अतिप्रचंड कालव्यासाठी सरकारला बरीच जमीन ताब्यात घ्यायची होती. त्यातील काही जमीन या तहसिलदारांनी सरकारी कागदपत्रात आपल्या मुलाच्या नावाने दाखवली. त्यासाठी खोडाखोड केली. मुलाच्या जन्माच्या दोन वषेर् आधीपासून ती जमीन त्याच्या नावावर होती असे आढळून आले! ती जमीन सरकारने घेतल्याबद्दल नरपतसिंहाला मोठी नुकसानभरपाई मिळाली. यावर मोठा गहजब झाला. महसूल खात्याने केलेल्या चौकशीत हे सारे उघड झाले. त्यावर राजस्थान विधानसभेत प्रश्ान् विचारला असता, या प्रकरणाची सीबीआयने चौकशी केली असून, त्यांना त्यात काही तथ्य आढळून आले नाही, असे भैराँसिंहांनी सांगितले. तथापि सीबीआयकडून चौकशी करून घ्या, असे राजस्थान सरकारने केंद सरकारला कळविलेच नव्हते, असे त्यावेळच्या संबंधित केंदीय मंत्री मार्गारेट अल्वा यांनी कळविले.

भैराँसिंह व जावई नरपतसिंह यांची आणखी एक कमाल सांगितली पाहिजे. राजस्थानात अलवार येथे शालिनी शर्मा नावाच्या भाजपच्या पुढारी होत्या. त्या व त्यांचे पती एक शाळा चालवत असत. तेथील एका शिक्षिकेला भाजपचे काही मंत्री व प्रमुख आमदार यांच्याशी शय्यासोबत करायला या शर्मा दाम्पत्याने भाग पाडले. त्यानंतर राजस्थान समाज कल्याण मंडळाच्या उपाध्यक्षपदी शालिनीबाईंची नेमणूक झाली. त्यासाठी भैराँसिंह व जावई यांनी पुढाकार घेतला होता, असे त्यावेळी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले होते. पुढे या शिक्षिकाप्रकरणी शर्मा पतिपत्नीवर खटला होऊन, न्यायालयाने त्यांची रवानगी तुरुंगात केली.

गेल्या काही दिवसात प्रतिभाताईंवर अनेक आरोप झाले. ते संकलित करून माजी केंदीय मंत्री अरुण शौरी यांनी त्यावर एक पुस्तिकाच लिहिली आहे. प्रतिभा महिला सहकारी बँकेबाबत रिझर्व बँकेचा एक अहवाल आहे. तसेच, कर्मचारी संघटनेचे सविस्तर निवेदन आहे. या निवेदनातील काही भाग हा रिझर्व बँकेचा अहवाल म्हणून शौरींनी दाखविला असे आता उजेडात आले आहे. प्रतिभाताईंच्या तीन नातेवाईकांना दिलेली कजेर् बुडाली असा आरोप आहे. या तीनपैकी एक नातेवाईक नव्हता. त्या तिघांनी ती कजेर् सव्याज परत केली. त्यांना नियमानुसार फक्त दंडात्मक व्याज माफ करण्यात आले; तरीही या आरोपांचा पुनरुच्चार चालूच आहे.

प्रतिभाताईंनी संत मुक्ताबाई सहकारी साखर कारखाना स्थापन केला. त्यासाठी घेतलेली कजेर् व त्यावरील व्याज यापैकी काहीसुद्धा चुकते केले नाही. पुढे तो कारखाना बंदच पडला आणि आता तर बँकेने तो जप्त केला आहे. अशा कर्जांना राज्य सरकारची हमी असते. माजी सहकारमंत्री आणि राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव गिरीधर पाटील यांनी धुळे जिल्ह्यात शिरपूर सहकारी साखर कारखाना स्थापन केला. त्याने घेतलेली कजेर् व त्यावरील व्याज यांची राज्य सरकारने हमीप्रमाणे फेड केली. पुढे राज्य सरकारने त्या रकमांची त्या कारखान्याकडून वसुली केलीच नाही. आता चित्र असे की प्रतिभाताई मोठ्या थकबाकीदार आणि शिवाजीराव मात्र मुळीच तसे नाहीत.

भारताच्या राष्ट्रपतीला उत्स्फूर्त इंग्रजी भाषण करता आले पाहिजे. प्रतिभाताईंना ते येते, भैराँसिंहांना नाही. राष्ट्रपती होणाऱ्याला जग व भारत यापुढील अतिमहत्त्वाच्या प्रश्नंाची जाण हवी. यासंबंधात दोन्ही उमेदवारांबाबत आनंद आहे. तरी या दोन उमेदवारांमध्ये प्रतिभाताई हे कमी संकट आहे, हे वरील सर्व विवेचनावरून लक्षात येईल.

Wednesday, April 25, 2007

राष्ट्रवादी-काँग्रेस विलीनीकरण हिताचे

शां. मं. गोठोसकर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याऐवजी आपले वेगळे अस्तित्व टिकवून ताकद वाढवावी; त्यातच महाराष्ट्राचे हित आहे, असे प्रतिपादन माजी केंदीय कॅबिनेट सचिव भालचंद देशमुख यांनी केले आहे. या विषयाची दुसरी बाजू मांडणारा हा लेख.

........

राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली असली तरी हा फक्त महाराष्ट्रापुरता पक्ष आहे. मान्यता देण्याच्या सदोष तरतुदींचा लाभ उठवून हा राष्ट्रीय पक्ष बनला. तो स्थापन झाल्यानंतर १९९९ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत त्याला जेवढी मते मिळाली त्याहून अधिक समाजवादी पक्ष, तेलुगू देसम, डीएमके, एआयएडीएमके, शिवसेना आदी राज्य पातळीवरील पक्षांना प्रत्येकी मिळाली. समाजवादी पक्षाच्या पदरात तर दुप्पट मते पडली होती. नंतरच्या निवडणुकांमध्ये या परिस्थितीत दखल घेण्याजोगा बदल झालेला नाही.

राज्य पक्षांची आपापल्या राज्यात जी सापेक्ष ताकद आहे, तिच्याशी तुलना करता राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात बळ केवढे आहे, हे पाहावयास हवे. भारतात प्रत्येकी दोन कोटींहून अधिक लोकवस्तीची १७ राज्ये असून बाकीची ११ प्रत्येकी एक कोटीहून कमी लोकसंख्येची आहेत. या मोठ्या राज्यांमध्ये समाजवादी पक्ष (उत्तर प्रदेश), तेलुगू देसम (आंध्रप्रदेश), डीएमके व एआयएडीएमके (तामिळनाडू), राष्ट्रीय जनता दल (बिहार), बिजू जनता दल (ओरिसा) आणि अकाली दल (पंजाब) यांच्या ताकदीचे प्रमाण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे आहे त्याहून अधिक आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे बळ राष्ट्रवादीएवढे आहे. विलीन व्हावे की नाही याचा राष्ट्रवाद्यांनी विचार करताना आपल्या ताकदीसंबंधीची ही वस्तुस्थिती प्रथम ध्यानात घ्यायला हवी.

राष्ट्रवादी वगळता अन्य पाच राष्ट्रीय पक्ष आणि वर उल्लेखिलेले राज्य पक्ष यांना काहीना काही सैद्धांतिक आधार किंवा तात्त्विक बैठक आहे; पण राष्ट्रवादी काँग्रेसला तशी काहीसुद्धा नाही. विदेशी मूळ असलेल्या सोनिया गांधींना विरोध या नकारात्मक भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. तर्कशास्त्रानुसार कोणतीही नकारात्मक भूमिका हा सैद्धांतिक किंवा तात्त्विक आधार असू शकत नाही. आता तर राष्ट्रवादीने राष्ट्रपतीपदासाठी भैराँसिंह शेखावत यांना पाठिंबा दिलेला आहे. सैद्धांतिक बैठकीच्या अभावी हे घडत आहे. सोनियांचे परदेशी मूळ ही बाब तर सध्या लोप पावली आहे.

मी पंतप्रधान होणे हे बहुजन समाज पक्षाचे अंतिम उद्दिष्ट आहे, असे त्या पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी नुकतेच सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचेही अंतिम उद्दिष्ट याच स्वरूपाचे आहे, असे म्हणता येईल. फरक एवढाच आहे की, लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत मिळालेल्या पक्षवार मतांमध्ये बसप तिसऱ्या तर राष्ट्रवादी दहाव्या क्रमांकावर होता. भारतात आतापर्यंत १३ पंतप्रधान झाले. त्यापैकी सहाजण केवळ योगायोगाने त्या पदापर्यंत पोचले. त्यासाठी आवश्यक ती राजकीय ताकद त्यांच्यापाशी नव्हती. पवारांना असे योगायोगाने हे पद नको आहे, हे उघड आहे. त्यांनी १६ वर्षांपूवीर् या पदासाठी दावा केला होता, तेव्हा त्यांना योगायोग मुळीच अपेक्षित नव्हता. मग आता करावे काय?

काँग्रेस सोडून गेलेले शरद पवार साडेआठ वर्षांनी त्या पक्षात परत आले, असे यापूवीर् घडलेले आहे. दुसऱ्या वेळी काँग्रेस सोडून साडेसात वषेर् होत आली आहेत. स्वगृही जाण्याची घटिका समीप आली आहे. पवार काँग्रेसमध्ये परत जाणार नाहीत असे तेसुद्धा ठामपणे सांगू शकणार नाहीत. मी एक वेळ तोंडाला काळे फासून हिमालयात जाईन; पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, असे ते १९८४ साली म्हणाले आणि त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत स्वगृही डेरेदाखल झाले. राहुल गांधींची पुरेशी तयारी होईपर्यंत तुम्हाला पंतप्रधान करते असे सोनियांनी आमंत्रण दिले तर पवार काय करतील? असे घडले तर भालचंद देशमुख चौथ्या पंतप्रधानांचे सल्लागार बनतील. क्वात्रोची प्रकरणातून बाहेर कसे पडायचे हा सोनियांपुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्ान् आहे. त्यांना सहीसलामत बाहेर काढू शकेल असा हिकमती राजकारणी एकच आहे आणि तो म्हणजे शरद पवार!

केंदातील राज्यर्कत्यांकडून महाराष्ट्रावर सतत अन्याय होतो असेही देशमुखांनी म्हटले आहे. पन्नास वर्षांपूवीर् मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा दिल्लीकरांनी घाट घातला, त्याची परिणती सी. डी. देशमुखांच्या राजीनाम्यात झाली, बेळगाव महाराष्ट्राला मिळाले नाही आदी उदाहरणे या लेखात देण्यात आली आहेत. वस्तुस्थिती वेगळी आहे. राज्यपुनर्रचनेपूवीर् मराठी प्रदेशांतील मराठी शाळांमध्ये भूगोल शिकवला जात असे त्यामध्ये मुंबई महाराष्ट्राची आहे, असे म्हटलेले नव्हते. त्यावेळीही या महानगरात बिगरमराठी लोक बहुसंख्येने होते. त्या सर्वांची मुंबई शहराचे वेगळे राज्य करावे, अशी मागणी होती. मराठी भाषिक राज्यात जाण्याला त्यांचा तीव्र विरोध होता. राज्यपुनर्रचना आयोगाने सर्व बाबींचा विचार करून शिफारसी केल्या. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र व महागुजरात चळवळी उभ्या राहिल्या. त्यावर विविध पर्यायांचा केंद सरकार विचार करीत होते. मुंबई शहराचे वेगळे राज्य हा त्यापैकी एक पर्याय होता. अखेरीस सर्व मराठी व गुजराती प्रदेशांचे मिळून मुंबईसह महाद्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले. पुढे साडेतीन वर्षांनी त्याचे विभाजन होऊन मुंबईसह महाराष्ट्र व गुजरात अशी दोन राज्ये निर्माण झाली. मुळात मुंबई महाराष्ट्राची होती आणि ती तोडण्याचा घाट घातला हे विधान इतिहासाला धरून नाही.

बेळगावबाबत असेच आहे. राज्य पुनर्रचना आयोगाने कन्नड बहुसंख्य असलेले बेल्लारी शहर तेलुगूभाषिक आंध्र राज्याला दिले होते. ज्या कारणांसाठी आम्ही बेल्लारी आंध्रला देतो त्याच कारणांसाठी मराठी बहुसंख्य असलेले बेळगाव शहर कर्नाटकाला देतो, असे आयोगाने आपल्या अहवालात म्हटले होते. पुढे केंद सरकारने बेल्लारी कर्नाटकाला द्यायचे ठरविले; पण बेळगावबाबत असा बदल केला नाही. बेल्लारी व बेळगाव यांना एकच माप लावा, अशी मागणी एकाही मराठी खासदाराने त्यावेळी केली नाही.

राज्य पुनर्रचनेवेळी केंदीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी राजीनामा दिला आणि त्यावर लोकसभेत भाषण केले. त्यावेळचे गृहमंत्री गोविंदवल्लभ पंत यांनी त्याला उत्तर दिले. ते म्हणाले, ''हे सर्व निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुमच्या उपस्थितीत घेण्यात आले. त्यावेळी तुम्ही आक्षेप का घेतला नाही?'' यशवंतराव चव्हाणांबाबत असेच आहे. काँग्रेसकडून आमंत्रण नसताना त्यांनी त्या पक्षात प्रवेश केल्याचे जाहीर केले; पण त्यांच्यासाठी दार उघडण्यात आले नाही. हा अवमान कसा? आमंत्रण नसताना त्यांनी हे पाऊल का टाकले? दिल्लीकरांचा महाराष्ट्राबद्दल आकस हा केवळ गैरसमज आहे, हे यावरून स्पष्ट होते.

प्रत्येक राज्यात राज्य पातळीवरचा एकेक बलवान पक्ष असावा आणि त्याने आपल्या ताकदीवर केंदाकडून त्या राज्याच्या मागण्या पदरात पाडून घ्याव्यात असा भालचंद देशमुखांच्या या लेखाचा मथितार्थ आहे. या तामिळनाडू पॅटर्नमुळे देशाचे ऐक्य धोक्यात येईल त्याचे काय? अत्युच्च स्थानांवर काम केलेल्या देशमुखांनी हा युक्तिवाद करावा याचे वैषम्य वाटते. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन झाला तर येत्या लोकसभा निवडणुकीनंतर त्या सभागृहातील काँग्रेस पक्षात महाराष्ट्राचा गट सर्वात मोठा राहील. ती गोष्ट महाराष्ट्राच्या अधिक हिताची ठरेल. या विलिनीकरणामुळे महाराष्ट्राचा कारभार चांगल्या प्रकारे चालविणे शक्य होईल.

Wednesday, March 28, 2007

साहित्यसंस्थांच्या अनुदानाचे वादंग!

शां. मं. गोठोसकर


महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वाषिर्क सभेत राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांना खास निमंत्रित करून त्यांना व्यासपीठावर स्थान दिले जाते. धनको किंवा दाता यांना नेहमीच उच्च स्थान असते ही गोष्ट आथिर्क व्यवहारांमध्ये गृहीत धरलेली असते. तिला साहित्यक्षेत्र अपवाद असू शकत नाही.

महाराष्ट्रातील प्रमुख मराठी साहित्यसंस्थांना राज्य सरकार आपल्या साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत दरवषीर् काही पैसे देते. हे मंडळ वेगळी संस्था नसून सरकारी यंत्रणेचा तो एक भाग आहे. या पैशांवरून सध्या मोठे वादंग चालू असून त्याबाबतचे लेख (म. टा. २५ फेब्रु., ५ मार्च व १६ मार्च) प्रसिद्ध झाले आहेत. या साहित्यसंस्थांच्या म्हणण्याचा थोडक्यात मथितार्थ असा: आम्ही स्वयंसेवी संस्था असून आमचे काम चालवायला आम्हाला सरकारकडून पैसा हवा आहे. सरकारकडचा पैसा हा जनतेचा पैसा आहे.

तेव्हा सरकारने फक्त पोस्टमनचे काम करावे आणि आमच्याकडे तो पोचवावा. तो पैसा आम्हा संस्थांच्या उदरनिर्वाहासाठी असल्याने त्यासंबंधात कसल्याही अटी घालू नयेत. त्यामुळे आमचा मानभंग होतो आणि आमची स्वायत्तता धोक्यात येते. आम्ही साहित्यसंस्थांचे पदाधिकारी आपला वेळ विनामोबदला खर्च करतो आणि पदरमोडही करतो. यास्तव ही बाब सन्मानपूर्वक हाताळण्यात यावी. त्यासाठी जरूर तर सध्याचे साहित्य संस्कृती मंडळ बरखास्त करून त्या जागी अन्य व्यक्तींची नेमणूक व्हावी. पदाधिकारी मंडळींचे हे म्हणणे तपासून पाहावयास हवे.

सरकारने आपल्याकडील पैसा कसा खर्च करावा याचे स्थूलमानाने मार्गदर्शन राज्यघटनेत केलेले आहे. त्यानुसार पैशाच्या विनियोगाचे कायदे केंद व राज्य सरकारांनी तयार केलेले आहेत. त्याप्रमाणे सरकार नियम ठरवून देते आणि आदेश काढते. या सर्वांनुसार खर्च होतो की नाही याची तपासणी महालेखापाल हा केंद सरकारचा अधिकारी करीत असतो. राज्यांबाबत आपला अहवाल तो राज्यपालांना सादर करतो. त्याची प्रत विधिमंडळापुढे ठेवावी लागते आणि तेथील लोक लेखा समिती त्यासंबंधात सविस्तर चौकशी करून आपला अहवाल तयार करते. या नेमून दिलेल्या चाकोरीतूनच साहित्यसंस्थांना पैसे मिळणार, पोस्टमनप्रमाणे मिळणार नाहीत, हे उघड आहे.

साहित्यसंस्थांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना हे पैसे सानुग्रह अनुदान हवे असतात. तथापि, सरकार ते साह्यार्थ आथिर्क तरतूद म्हणून देते. राज्यघटना व कायदा यांनुसार सानुग्रह अनुदान म्हणून हे पैसे देता येत नाहीत म्हणून साह्यार्थ आथिर्क तरतूद या पद्धतीने ते दिले जातात. असे देताना ते कोणत्या कामांसाठी किती वापरले जावेत हे नेमून द्यावे लागते. साहित्य संस्कृती मंडळाने ते नेमून दिले आहे. त्याप्रमाणे ते खर्च होत नाहीत असे महालेखापालांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. त्यावर विधिमंडळाच्या लोक लेखा समितीने मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कणिर्क यांना बोलावून याबद्दल जाब विचारला तर त्यांनी काय उत्तर द्यावे?

महाराष्ट्रात फक्त राज्य सहकारी सूतगिरणी संघाला वर्षाकाठी १५ लाख रुपये उदरनिर्वाहासाठी अनुदान मिळते, अन्य कोणालाही तसे दिले जात नाही. मंत्रिमंडळातील मंडळींच्याच सूतगिरण्या असल्यामुळे ही गोष्ट शक्य झाली. साह्यार्थ आथिर्क तरतूद शतीर् घालूनच दिली जाते. जगात सर्वत्र 'माय मनी माय विझ्डम' या उक्तीप्रमाणे पैसे व कजेर् दिली जातात. याचकाने किंवा ऋणकोने त्यावर कधी आक्षेप घ्यायचा नसतो, हे ठरून गेल्यासारखे आहे. संबंधित साहित्यसंस्थांना याची जाणीव नाही असे दिसते. पैसे तुमचे, पण शहाणपण माझे, असा प्रकार फक्त अंबानींबाबत आढळून येतो.

साहित्य संस्कृती मंडळाने साहित्यसंस्थांच्या कार्यकारिणींवर आपला प्रतिनिधी नेमल्याने त्या संस्थांच्या स्वायत्ततेला बाधा झाली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. खरे म्हणजे ही जगन्मान्य रूढी आहे. तिला आक्षेप घेणाऱ्या या फक्त साहित्यसंस्थाच दिसतात. ज्या संस्थेला पैसे द्यायचे ती कोणत्या कायद्याखाली स्थापन झाली आहे, तिची घटना काय आहे, त्याप्रमाणे तिची कार्यकारिणी बनली आहे काय, त्या घटनेनुसार तिचे कामकाज चालते काय आणि तिच्या हिशेबतपासणी अहवालात काही आक्षेपार्ह आहे काय, असे सारे पैसे देणारा पाहतो. तथापि, मंडळाने संबंधित साहित्यसंस्थांबाबत असे काहीसुद्धा पाहिलेले नाही. खरे म्हणजे ही आक्षेपार्ह गोष्ट आहे. मंडळाच्या या सौजन्याबद्दल आभार मानायचे सोडून त्याच्याविरुद्ध कांगावा केला जातो, याला काय म्हणावे?

साहित्यसंस्थांच्या घटनेत तरतूद नसताना कार्यकारिणीवर मंडळाचा प्रतिनिधी कसा नेमला जातो हा आक्षेप निरर्थक आहे. पैसा घेणाऱ्या बहुतेक संस्था तशी तरतूद मुळातच करून ठेवतात. तरतूद नसताना तुम्ही त्या प्रतिनिधीला घेतलाच कसा असा आक्षेप, पैसे मिळत असल्यामुळे हिशेबतपासनीस व चॅरिटी कमिशनर किंवा तत्सम अधिकारी घेत नाहीत. साहित्यिक म्हणजे काय याच्या व्याख्येत बसणारी व्यक्तीच साहित्यसंस्थेची पदाधिकारी असली पाहिजे, अशी अट सा. सं. मंडळाने घातली तर काय होईल? अगदी बेताचीच आथिर्क परिस्थिती असलेल्या एका साहित्यसंस्थेचे एक पदाधिकारी तिच्या कामासाठी व तिच्या खर्चाने विमानाने प्रवास करतात. मजूर सहकारी संस्था फेडरेशनचे पदाधिकारी आणि गोव्यातील सरपंच दिल्लीला विमानाने जातात. पण या साहित्यसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांसारखा कांगावा करीत नाहीत. साहित्यसंस्थांना ज्या कामांसाठी पैसे दिले, त्या कामापुरतेच त्या प्रतिनिधींनी पाहायचे असते, हा कणिर्कांचा खुलासा बरोबर नाही. अशा प्रतिनिधीला निवडून आलेल्या सभासदाएवढेच कायद्यानुसार अधिकार असतात.

दरवर्षी अ. भा. मराठी साहित्य संमेलन भरविण्यासाठी राज्य सरकारकडून २५ लाख रुपये अनुदान दिले जाते. तेसुद्धा साहित्य संस्कृती मंडळामार्फत अदा करण्यात येते. हे करताना, मंडळाच्या अध्यक्षांना व्यासपीठावर स्थान दिले पाहिजे, या शतीर्वर आक्षेप घेण्यात आला आहे. इतर जगात सोडाच, पण महाराष्ट्रात काय चालते हे न पाहता हा कांगावा करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वाषिर्क सभेत राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांना खास निमंत्रित करून त्यांना व्यासपीठावर स्थान दिले जाते. धनको किंवा दाता यांना नेहमीच उच्च स्थान असते ही गोष्ट आथिर्क व्यवहारांमध्ये गृहीत धरलेली असते. तिला साहित्यक्षेत्र अपवाद असू शकत नाही.

साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी कणिर्क आल्यानंतर त्यांनी मंडळाच्या कार्यालयासाठी प्रथम चांगली जागा मिळवली. साहित्याच्या विकासार्थ अन्य राज्यांशी तुलना करता महाराष्ट्रात राज्य सरकारकडून पुरेसा पैसा मिळत आहे काय आणि अन्य राज्य सरकारे साहित्यक्षेत्रात कोणते उपक्रम राबवत आहेत, याचा शोध अध्यक्ष घेत आहेत. केंद सरकारची मानव संसाधन आणि अन्य मंत्रालये व त्यांच्या खालच्या यंत्रणा यांजकडून साहित्य विकासार्थ खर्च होणाऱ्या पैशाचा काही भाग महाराष्ट्रातील या संस्थांसाठी उपलब्ध करता येईल काय, याच्या प्रयत्नातही अध्यक्ष आहेत. तसेच, युनेस्को व अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कोणते लाभ पदरात पाडून घेता येतील, याची माहिती ते मिळवित आहेत. असे असताना त्यांची उचलबांगडी करा, अशी मागणी साहित्यसंस्थांची ही मंडळी करीत आहेत.

त्यांचे डोके ठिकाणावर आहे काय?

Wednesday, March 14, 2007

श्रीमुखात भडकावून द्यायची झाली तर..!

शां. मं. गोठोसकर

भारताच्या राजकारणात हिंदी भाषिकांचे प्राबल्य आहे, तसेच बिगरहिंदी राज्यांमध्ये प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हिंदी भाषिकांची ही लुडबूड येथेच संपत नाही. मुंबई महापालिकेचे सभागृह व प्रशासन यांमध्ये हिंदी भाषा हे माध्यम असावे, अशी त्यांची मागणी असते. मुंबईचे स्वतंत्र राज्य करण्याची मागणी आता पुढे आली, तर त्यात हिंदी भाषिकांचाच पुढाकार राहील, हे ओळखले पाहिजे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या राजकीय पक्षाचा पहिला वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. कोणा बिहारीने महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाला आईवरून शिवी दिली तर कानफटात मारली जाईल, असा इशारा या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याप्रसंगी दिला. दूरचित्रवाहिन्यांवर हे वृत्त लगेच झळकले. त्यावर लालू प्रसाद यादव, नितीश कुमार आदी प्रमुख बिहारी नेत्यांनी तत्काळ तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वीस वर्षांपूवीर् खलिस्तान चळवळ जोरात असताना पंजाबात शेतमजूर म्हणून गेलेल्या बिहारी लोकांपैकी शेकडो जणांची शीख अतिरेक्यांनी हत्या केली. अलीकडेच आसामात उपजीविकेसाठी गेलेल्या बिहारींची उल्फा दहशतवाद्यांनी कत्तल केली. त्यावर बिहारी नेत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आताएवढ्या कडक नव्हत्या, हे लक्षात घेतले पाहिजे.

या बाबीच्या नेमके उलट काही दिवसांपूवीर् घडले होते. ख्यातनाम अभिनेत्री व खासदार हेमामालिनी यांची एका दूरचित्रवाहिनीवर मुलाखत चालू होती. उत्तर भारतीयांना मुंबईत सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही, अशी खंत मुलाखत घेणाऱ्याने व्यक्त केली. त्यावर, अशी वागणूक मिळत नसेल तर संबंधितांनी आपल्या राज्यात निघून जावे, असे हेमामालिनी म्हणाल्या. त्यावर एवढा गहजब झाला की खासदारबाईंना घुमजाव करणे भाग पडले.

या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकभाषिक राज्यात भाषिक अल्पसंख्याकांंचे स्थान काय हा खरा प्रश्ान् आहे. पन्नास वर्षांपूवीर् राज्य पुनर्रचना झाली ती दोन अपवाद वगळता एकभाषिक राज्यरचना होती. थोड्याच वर्षांनी त्या अपवादांचीही एकभाषिक राज्ये झाली. राज्य पुनर्रचना आयोगाने यासंबंधात इशारा देऊन ठेवला होता. एकभाषिक राज्यांमध्ये तेथील मुख्य भाषेच्या लोकांनी ते राज्य आपल्याच मालकीचे आहे असे समजता कामा नये आणि असे राज्य हे उपराष्ट्र आहे, असा त्यांचा गैरसमज होता कामा नये, असे त्या अहवालात म्हटले होते. तथापि, आयोगाची ती भीती खरी ठरली असे प्रत्यक्षात घडले. बिगरहिंदी राज्यांमधील भाषिक अल्पसंख्याक हे तेथे दुय्यम दर्जाचे नागरिक ठरले.

भारतात हिंदी भाषिकांची नऊ राज्ये असून बाकीची एकभाषिक आहेत. त्या बिगरहिंदी राज्यांतील मुख्य भाषा ही तेथे कायद्याने अधिकृत भाषा करण्यात आली आणि त्या भाषिकांना ते राज्य फक्त आपलेच आहे असे वाटते. राष्ट्रगीतासारखे तेथे राज्यगीत असते. (उदा. महाराष्ट्रगीत). सभा संपताना 'जय हिंद'बरोबर 'जय महाराष्ट्र' असाही घोष होतो. राष्ट्रदोहीप्रमाणे 'महाराष्ट्रदोही' असाही वाक्प्रचार वापरात असतो. बहुतेक सर्व बिगरहिंदी राज्यांमध्ये असे आढळते. अशा प्रकारे बिगरहिंदी राज्ये प्रत्यक्षात उपराष्ट्रे बनल्यामुळे त्यांचे विभाजन म्हणजे राष्ट्र तोडण्याचाच प्रकार आहे, असे संबंधित भाषिकांना वाटते. ही बाब हिंदी राज्यांना लागू नाही. त्यामुळे उत्तराखंड, झारखंड व छत्तीसगड ही नवी हिंदी राज्ये निर्माण होऊ शकली. परंतु तेलंगण, विदर्भ आदी राज्ये स्थापन करायची तर 'उपराष्ट्रे' मोडावी लागतात. साहजिक त्या मागण्या मान्य करणे कठीण होते. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी केंदात सत्तेवर असताना तीन नवी हिंदी राज्ये निर्माण झाली. त्यानंतर त्यावेळचे उपपंतप्रधान व गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी नागपूरला आले असताना, महाराष्ट्र विधानसभेने तसा ठराव केला तर आम्ही विदर्भाचे वेगळे राज्य देऊ असे ते म्हणाले. त्याला तीव्र आक्षेप घेणारे पत्र तेव्हाचे विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी त्यावेळचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना लिहिले. त्यामध्ये 'उपराष्ट्र' ही बाब त्यांच्या नजरेला आणून दिली आणि अडवाणींचे वक्तव्य हा शुद्ध आगलावेपणा आहे असे ठासून नमूद केले. त्यानंतर आणखी नवी राज्ये स्थापन करण्याचा आपल्यापुढे प्रस्ताव नाही असे सरकारने सांगून टाकले.

हिंदी राज्ये उपराष्ट्रे नसल्यामुळे त्या भाषिकांना या बाबीची जाणीवच नसते. ते जेव्हा बिगरहिंदी राज्यात जातात तेव्हा तेथील भाषा शिकण्याची आपणाला गरज आहे, असे त्यांना वाटत नाही. त्या राज्यातील लोक राष्ट्रभाषा म्हणून हिंदी शिकलेलेच असतात. मग आपणाला त्यांची भाषा शिकण्याची गरजच काय, असे त्या हिंदी भाषिकांना वाटते. राज्यघटनेनुसार देशात कोठेही स्थायिक होण्याचा अधिकार आहे. एवढ्यावरच ही हिंदी मंडळी थांबत नाहीत. त्यांना बिगरहिंदी राज्यांच्या राजकारणात भाग घ्यायचा असतो. भारताच्या राजकारणात हिंदी भाषिकांचे प्राबल्य आहे, तसेच बिगरहिंदी राज्यांमध्ये प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मुंबई महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीवेळी काँग्रेस व भाजप त्यांच्याकडे उमेदवारीसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये मराठी इच्छुकांच्या अनेक पटींनी हिंदी भाषिक होते. यावेळी प्रथमच राणे फॅक्टरमुळे व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष गुरुदास कामत यांनी मनावर घेतल्यामुळे अधिक मराठी इच्छुकांना त्या पक्षाची तिकिटे देण्यात आली. त्यामुळे हिंदी भाषिक इच्छुकांना झुकते माप मिळाले नाही. हेमामालिनीना तसा प्रश्ान् विचारला जाण्यामागे हेच कारण होते.

हिंदी भाषिकांची ही लुडबूड येथेच संपत नाही. मुंबई महापालिकेचे सभागृह व प्रशासन यांमध्ये हिंदी भाषा हे माध्यम असावे, अशी त्यांची मागणी असते. या आगाऊपणाबद्दल प्रथम कानफटीत मारणे गरजेचे आहे. आंध्रप्रदेश राज्य तोडण्याचे पाप आपल्या माथी नको म्हणून दुसरा राज्य पुनर्रचना आयोग नेमा, असे काँग्रेसने केंद सरकारला सांगितले आहे. असा पहिला आयोग स्थापन झाला तेव्हा म्हणजे ५३ वर्षांपूवीर् मुंबई महानगराचे वेगळे राज्य स्थापन व्हावे अशी मागणी येथील जवळजवळ सर्व बिगरमराठी लोकांनी केली होती. ही मंडळी पुन्हा उचल खाणार यात शंका नाही. त्यावेळी या संबंधात गुजराती मंडळींकडे याचे नेतृत्व होते, आता ते हिंदी भाषिकांकडे राहील, हे वेगळे सांगायला नको. या संकटाला तोंड देण्यासाठी एखाद्या ताकदवान पक्षाने/नेत्याने मनावर घेऊन आतापासून तयारीत असणे गरजेचे आहे.

मुंबईत मराठी लोक आथिर्कदृष्ट्या दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत, असे बिगरमराठी मंडळी गृहीत धरतात. महापालिकेच्या नियमाप्रमाणे पाट्या मराठीत लावायला हे लोक तयार नाहीत. मराठी लोकांबाबत आता वस्तुस्थिती बरीच बदलली आहे. राज ठाकरे व मनोहर जोशी यांनी संयुक्तपणे कोहिनूर गिरणीची जागा शेकडो कोटी रुपयांना खरेदी केली, एवढीच ती मर्यादित नाही. मुंबईतील सर्वात मोठ्या मॉलमध्ये येणाऱ्या गिऱ्हाइकांमध्ये मराठी लोकच सर्वात जास्त असतात, असे सवेर्क्षणात आढळून आले. दरडोई किमान पाच हजार रुपये घेऊन केवळ एक दिवसाची सागर सफर घडविणाऱ्या स्टार क्रूझमध्ये मराठी मंडळी सर्वात मोठ्या संख्येने असतात. आपण आथिर्कदृष्ट्या दुय्यम नागरिक आहोत, असा न्यूनगंड मराठी लोकांनी बाळगण्याचे कारण नाही, असा याचा अर्थ.

याबरोबरच आणखी महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईत येणारे लोंढे रोखण्याची. राज्यघटनेनुसार कोणाही नागरिकाला देशात कोठेही स्थायिक होण्याचा अधिकार असला तरी सार्वजनिक हितासाठी त्यावर बंधन घालणारा कायदा सरकार करू शकेल, असे त्यात म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगर प्रदेशासाठी असा कायदा करून या लोंढ्यांना प्रतिबंध केला पाहिजे. मुंबई महापालिकेने असा ठराव केला तरच त्यासाठी राज्य सरकारला बळ प्राप्त होईल. मनसेने यासंबंधात पुढाकार घ्यायला हवा. त्यानंतर तसा ठराव झाला नाही, तर इतर पक्षांचे पितळ उघडे पडेल. राज ठाकरे यांनी यथायोग्य पावले टाकून या बाबी तडीस नेल्या नाहीत, तर बिहारींच्या कानफटात लगावण्याऐवजी आपल्याच श्रीमुखात भडकावून घेण्याची कालांतराने त्यांच्यावर पाळी येईल.
Click here to read this article on Maharashtratimes.com

Wednesday, February 28, 2007

शामलाल यांना गुगली!

' टाइम्स ऑफ इंडिया'चे भूतपूर्व संपादक शामलाल यांचे नुकतेच निधन झाले. या दैनिकात त्यांचे 'लाइफ अँड लेटर्स' हे साप्ताहिक सदर बुधवारी प्रसिद्ध होत असे. जगात नव्याने विशेष गाजत असलेल्या साहित्यकृतींचे परीक्षण त्या सदरात येत असे. देशाबाहेर महत्त्वाचे काही चालले असल्यास ते भारतवासीयांना प्रथम समजावून देण्याचा अधिकार आपलाच आहे असे ते समजत. त्यांना एका पत्रकाराने यशस्वी गुगली टाकली त्याची ही गोष्ट. बोरिस पास्तरनाक या ख्यातनाम रशियन लेखकाची डॉ. झिवागो या आत्मचरित्रात्मक नोबेल विजेत्या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाच्या प्रती मुंबईत स्टँड बुक स्टॉलमध्ये पोचल्या. त्यावेळी 'इंडियन एक्सप्रेस'मधील एक पत्रकार मोहन राव तेथे उपस्थित होते. तो शनिवार होता. आलेल्या प्रतींपैकी 'टाइम्स' व 'एक्सप्रेस' यांना एकेक द्यायची होती. 'लाइफ अँड लेटर्स'सारखे ग्रंथ समीक्षणाचे राव यांचे सदर शुक्रवारी 'एक्सप्रेस'मध्ये प्रसिद्ध होत असे. डॉ. झिवागोची प्रत 'टाइम्स'मध्ये सोमवारी दिली, तर त्यावर बुधवारच्या अंकात शामलाल लिहिणार हे उघड होते. यास्तव, दोन्ही दैनिकांना गुरुवारी प्रती द्या, अशी विनंती राव यांनी बुक स्टॉलचे मालक शानभाग यांना केली. ते व राव दोघे कोकणी असल्यामुळे त्यांचे सख्य होते. मग राव यांनी एक प्रत घरी नेली आणि सोमवारी परत आणून दिली. पुढे शानभागांनी त्या प्रती गुरुवारी दोन्ही दैनिकांना पाठवून दिल्या. दुसऱ्या दिवशी शामलाल पाहतात तर 'एक्सप्रेस'मध्ये डॉ. झिवागोवर समीक्षण प्रसिद्ध झाले होते. त्यांना संताप अनावर झाला. त्यांनी शानभाग व 'एक्सप्रेस'चे त्यावेळचे संपादक फ्रँक मोराइस यांच्याकडे चौकशी केली असता, त्या प्रती गुरुवारीच वाटण्यात आल्या होत्या, याबद्दल त्यांची खात्री झाली. त्याचबरोबर मोहन राव यांनी चांगलीच कुरघोडी केली हेसुद्धा त्यांच्या लक्षात आले.
शां. मं. गोठोसकर, वडाळा.
Click here to read this letter on Maharashtratimes.com

Thursday, February 15, 2007

राज ठाकरे हरले की जिंकले?

शां. मं. गोठोसकर

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांना कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करता येणार नाही, एवढे यश मनसेने या निवडणुकीत संपादन केले आहे. राज ठाकरे यांचे बंड फसले आणि मनसेचा या निवडणुकीत फज्जा उडाला, असा निष्कर्ष या निवडणुकीच्या निकालानंतर ज्यांनी काढला, ते कसे चूक होते, हे यावरून लक्षात येईल.

महाराष्ट्रातील दहा महापालिकांची नुकतीच निवडणूक झाली. राज्यातील एकूण मतदारांपैकी २६ टक्के या निवडणुकांत मतदानास पात्र होते. राजधानी, उपराजधानी, सांस्कृतिक राजधानी (पुणे) आणि अन्य महत्त्वाच्या व राज्यभर पसरलेल्या शहरांच्या या महापालिका होत्या. या दृष्टीने बघितल्यास ही सर्व अर्थाने विधानसभेची छोटी निवडणूकच होती. त्यामध्ये कोणत्या पक्षांना विजय मिळाला आणि कोणाला पराभव पत्करावा लागला, याबाबत बराच काथ्याकूट झाला. तो सर्व कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, यावर आधारित होता. याउलट, पक्ष म्हणून मान्यता देण्यासाठी किंवा दिलेली मान्यता रद्द करण्यासाठी लोकसभा-विधानसभांच्या निवडणुकांमध्ये मते किती मिळाली, याचाच विचार केंदीय निवडणूक आयोग प्रामुख्याने करतो. आयोगाच्या दृष्टिकोनातून या निकालांचे विश्लेषण केले, तर काही वेगळेच चित्र बघावयास मिळते.

भारतात केंदीय निवडणूक आयोगाकडे ८७५ राजकीय पक्ष नोेंदलेले आहेत. त्यापैकी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट अशा सहा पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्या प्रत्येकाला खास निवडणूक चिन्ह दिलेले असते. हे पक्ष लोकसभेच्या वा विधानसभेच्या सर्व जागांसाठी उमेदवार उभे करू शकतात. त्या व्यतिरिक्त ४३ पक्षांना राज्य पातळीवरचे पक्ष म्हणून मान्यता आहे. त्यातील काही पक्षांना एकाहून अधिक राज्यांसाठी मान्यता मिळालेली आहे. त्यांनाही खास निवडणूक चिन्ह दिलेले असते.

महाराष्ट्रात मुख्य वा केंदीय कार्यालय असलेले एकूण ५६ राजकीय पक्ष असले, तरी राज्य पातळीवरचा पक्ष म्हणून फक्त शिवसेनेला मान्यता आहे. अन्य राज्यात अशी मान्यता असलेल्या एकाही पक्षाला महाराष्ट्रासाठी हा दर्जा नाही. तथापि, मान्यता नसलेल्या किती तरी पक्षांनी या १० महापालिकांच्या निवडणुकीत भाग घेतला होता.

राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी त्या त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत किमान सहा टक्के मते मिळायला पाहिजेत आणि किमान दोन उमेदवार निवडून आले पाहिजेत. अर्थात, याला एक पर्यायही आहे. विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या किमान तीन टक्के एवढे त्या पक्षाचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. महाराष्ट्रात ही संख्या नऊ एवढी होते. या १० महापालिकांच्या निवडणुकीतील एकूण वैध मतदानात फक्त पाच पक्षांना सहा टक्क्यांहून अधिक मते मिळाली. त्यापैकी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष आहेत. शिवसेनेलाही त्या मर्यादेहून बरीच जास्त मते मिळाली आहेत.

पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे राज ठाकरे यांनी स्थापन केलेला 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' हाही त्या पाच पक्षांपैकी एक पक्ष आहे. या पक्षाला ८.५६ टक्के मते मिळाली आहेत. केवळ दहा महिन्यांपूवीर् स्थापन झालेल्या या पक्षाने मतांची किमान मर्यादा सहजपणे ओलांडली हे विशेष होय. या निवडणुकीत या पक्षाला तीन टक्के जागा मिळाल्या, ही बाबसुद्धा येथे ध्यानात घ्यायला हवी. मनसेच्या खालोखाल समाजवादी पक्षाचा क्रमांक लागला. त्याला केवळ अडीच टक्के मते मिळाली.

मनसेला केवळ दखल घेण्यापुरती मते मिळाली, असा याचा अर्थ नाही. इतर पक्षांशी तुलना करता, या पक्षाने चांगलीच मते मिळवली, असे ही आकडेवारी दाखवून देते. शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या निम्म्याहून थोडी जास्त मते मनसेच्या पदरात पडली. राष्ट्रवादीने कमावलेल्या मतांच्या ५३ टक्के मते मनसे मिळवू शकली. तर भाजपच्या पारड्यात पडलेल्या मतांच्या ७४ टक्के मते मनसेने हस्तगत केली आहेत. या सर्वाचा अर्थ असा की काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांना कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करता येणार नाही, एवढे यश मनसेने या निवडणुकीत संपादन केले आहे. राज ठाकरे यांचे बंड फसले आणि मनसेचा या निवडणुकीत फज्जा उडाला, असा निष्कर्ष या निवडणुकीच्या निकालानंतर ज्यांनी काढला, ते कसे चूक होते, हे यावरून लक्षात यायला हरकत नसावी.

शिवसेना स्थापन झाल्यापासून पहिली २२ वर्षे सर्व निर्णय बाळासाहेब ठाकरे हेच घेत असत. पुढे त्या पक्षात राज ठाकरे सक्रिय झाल्यानंतर त्यांना काही अधिकार मिळाले. नंतर सहा वर्षांनी उद्धव ठाकरे रंगपटावर आले. नऊ वर्षांनी ते कार्याध्यक्षपदी विराजमान झाले. त्याचा परिणाम म्हणून राज ठाकरे वळचणीला पडले. मग त्यांनी काय करावे? धीरूबाई अंबानी यांच्या निधनानंतर ज्येष्ठ पुत्र मुकेश यांनी धाकटे बंधू अनिल यांना वळचणीला टाकले. वर्षभर तसे राहिल्यानंतर यशस्वी बंड करण्याएवढी आपली कुवत आहे, हे अनिलनी जाहीररीत्या व मोठ्या खुबीने सूचित केले. त्यानंतर आईला मध्यस्थी करायला भाग पाडून रिलायन्स उद्योग समूहाचे विभाजन घडवून आणले. राजकीय पक्षाचे तसे धडेवाटप होऊ शकत नाही. यास्तव, राज ठाकरे यांनी तीन वषेर् वाट पाहून बंड केले. शिवसेना सोडून त्यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला. या १० महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना एकत्र जेवढी मते मिळाली, त्याचा तिसरा हिस्सा एवढी राज ठाकरे यांच्या पदरात पडली. जनतेच्या न्यायालयात त्यांना रास्त हिस्सा मिळाला, असा याचा अर्थ घ्यायला हरकत नाही. मान्यताप्राप्त पक्ष होण्यासाठी लागू असलेल्या सर्व शर्ती विधानसभेच्या पुढच्या निवडणुकीत मनसे सहजरीत्या पुऱ्या करील, असे गृहीत धरायला हरकत नाही.

राजकीय पक्ष सोडून बंड केले आणि नवा पक्ष स्थापन केला, असे महाराष्ट्रात आतापर्यंत चार-पाच प्रकार झाले. शंकरराव चव्हाणांनी १९७८ साली, पुढच्या वषीर् नासिकराव तिरपुड्यांनी व १९८४ साली अंतुल्यांनी वेगळे काँग्रेस पक्ष स्थापन केले होते; पण त्यांचा टिकाव लागू शकला नाही.

काँगेसपासून दूर होऊन फक्त शरद पवारच टिकून राहू शकले. खरे म्हणजे सबंध देशात काँग्रेसचा त्याग करून वेगळा पक्ष काढला आणि पुरून उरले असे हे एकच उदाहरण आहे. राज ठाकरे यांचे आताचे यश हे पवारांसारखेच आहे. राष्ट्रवादीचा त्याग करून जनसुराज्य शक्ती हा पक्ष स्थापन करून चार उमेदवार विधानसभेवर निवडून आणणाऱ्या विनय कोरे यांचे यश त्यामानाने मर्यादित म्हणावे लागेल.

या यशामुळे महाराष्ट्रातील पहिल्या दहा प्रमुख राजकारणी व्यक्तींमध्ये राज ठाकरे यांची गणना करावी लागते. राजकीय ताकदीनुसार त्यांचा क्रम असा- शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, नारायण राणे, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, अजित पवार, राज ठाकरे आणि आर. आर. पाटील. राज ठाकरे यांनी बंड करून वेगळा पक्ष स्थापन केला नसता, तर महाराष्ट्रातील पहिल्या २५ राजकारणी व्यक्तींमध्ये त्यांची गणना झाली नसती. त्यांना अजून किमान ३५ वषेर् राजकारण करायचे आहे. त्यामुळे मनसेची ताकद वाढविण्यासाठी ते पुढे कोणती पावले टाकतात, याकडे राजकीय निरीक्षकांनी लक्ष ठेवायला हवे.

Wednesday, January 24, 2007

मुंबईच्या प्रश्ानंकडे दुर्लक्ष

शां. मं. गोठोसकर

रोजच्या रोज बाहेरच्या लोकांचे प्रचंड लोंढे मुंबईर्त येत राहिल्यास, कितीही पैसा उपलब्ध करून दिला तरी महापालिका किमान आवश्यक एवढ्या नागरी सुविधा पुरवू शकणार नाही. हे लोंढे थोपविण्यासाठी कायदा करा, अशी मागणी करणारा ठराव मुंबई महापालिकेने केला, तरच तो करण्याचे धैर्य महाराष्ट्र सरकारला होईल. तरी राजकीय पक्षांनी यासंबंधात आपली भूमिका स्पष्ट करावी.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी प्रस्तृत केलेल्या जाहीरनाम्यांमध्ये अतिमहत्त्वाच्या मूलभूत बाबीकडे लक्ष दिलेले दिसत नाही. या महानगरात नागरी सुविधा पुरविणे ही महापालिकेची मुख्य जबाबदारी आहे. पण येथे रोजच्या रोज बाहेरच्या लोकांचे प्रचंड लोंढे स्थायिक होण्यासाठी येत राहिल्यास, महापालिकेला कितीही पैसा उपलब्ध करून दिला तरी ती किमान आवश्यक एवढ्या नागरी सुविधा पुरवू शकणार नाही. या देशातील ''सर्व नागरिकांस भारताच्या कोणत््याही राज्यक्षेत्रात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार असेल'', असे राज्यघटनेच्या १९व्या कलमात म्हटलेले आहे. तथापि, सार्वजनिक हितार्थ त्यावर मर्यादा घालण्याचा कायदा सरकारला करता येईल, असेही त्यामध्ये सांगितले आहे. हे लोंढे थोपविण्यासाठी कायदा करा अशी मागणी करणारा ठराव मुंबई महापालिकेने केला तरच तो करण्याचे धैर्य महाराष्ट्र सरकारला होईल. तरी राजकीय पक्षांनी यासंबंधात आपली भूमिका स्पष्ट करायला हवी.

मुंबईच्या विकासखर्चाला पैसा फार अपुरा पडतो. त्यासंबंधात राज्य सरकारपुढे घटनात्मक अडचण आहे. महाराष्ट्रात विकासखर्चाचे वाटप कसे करायचे याचा दंडक राज्यघटनेच्या ३७१ कलमाने घालून दिला आहे. त्यामध्ये या राज्याचे विदर्भ, मराठवाडा व उर्वरित (म्हणजे पश्चिम) महाराष्ट्र असे तीन प्रदेश कल्पिले असून त्यांवर समन्यायानुसार खर्च झाला पाहिजे, असे सांगितले आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या निधीतून मुंबईचा विकासखर्च भागवायचा, असा याचा अर्थ होतो. राज्य सरकारच्या महसुलात मुंबई महानगर प्रदेशाचा हिस्सा ८० टक्क्यांहून अधिक आहे. असे असताना त्याच्या विकासखर्चासाठी लागणारे पैसे मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या हिश्श्यातून घ्यायचे, हीच बाब मुळात समन्यायानुसार नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या निधीपैकी बराच मोठा भाग या प्रदेशातील विशेष राजकीय ताकद असलेले जिल्हे आपल्याकडे ओढून घेतात. त्यामुळे मुंबईच्या वाट्याला किमान आवश्यक एवढासुद्धा निधी मिळू शकत नाही. मग कोकणच्या वाट्याचे पैसे मुंबईवर खर्च करायचे, असा हा प्रकार गेली ४६ वषेर् चालू आहे. प्राथमिक शिक्षणावरील खर्च ही राज्य सरकारची जबाबदारी असते. मुंबई महापालिका त्यावर वर्षाकाठी चारशे कोटी रुपये खर्च करते. त्यातील काहीसुद्धा हिस्सा महाराष्ट्र सरकार उचलत नाही. मग रस्त्यांसाठी खर्च करायचे काही पैसे प्राथमिक शिक्षणावर खर्च केले जातात. अशा परिस्थितीत रस्त्यात खड्डे पडणार नाहीत तर काय होणार? हा अन्याय दूर होण्यासाठी महाराष्ट्राचे विदर्भ, मराठवाडा, मुंबई महानगर प्रदेश, उर्वरित कोकण व उर्वरित पश्चिम महाराष्ट्र असे पाच विभाग कल्पिले पाहिजेत. मुंबई महानगर प्रदेशावर रास्त विकासखर्च करून बाकीच्या निधीचे उर्वरित चार विभागांवर समन्यायानुसार वाटप व्हावयास हवे. अशी व्यवस्था झाली तरच राज्य सरकारच्या तिजोरीतून अन्याय न होता मुंबईसाठी पैसा मिळू शकेल.

लोंढे वाढून दिल्ली बकाल होऊ नये म्हणून तिच्या आसमंतासह प्रदेशाचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय राजधानी प्रदेश कल्पिण्यात आला. त्याकरिता केंद सरकारच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत असतो. या सरकारच्या तिजोरीत सर्वात जास्त भर मुंबईतून पडत असते. याचे कारण हे महानगर ही भारताची आथिर्क राजधानी आहे. यास्तव, मुंबई महानगर प्रदेश हा राष्ट्रीय आथिर्क राजधानी प्रदेश आहे, असे कल्पून त्याच्या विकासासाठी केंद सरकारच्या तिजोरीतून निधी उपलब्ध व्हावयास हवा. हे साध्य होण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रस्ताव मांडून त्यासाठी जोर लावला पाहिजे. पण जाहीरनामे पाहता, निधी उपलब्ध करणे ही बाब कोणाच्याही गावी नाही असे दिसते. अन्य महानगरांतील उपनगर रेल्वे तोट्यात असून मुंबईची नफ्यात आहे. इतर ठिकाणचा तोटा मुंबईने भरून द्यायचा असा हा प्रकार आहे. आता तर इतर ठिकाणांपेक्षा मुंबईचे रेल्वेचे दर वाढवायचे असा विचार चालला आहे. हे टाळण्यासाठी आणि या उपनगर रेल्वेचा पुरेशा गतीने विकास होण्यासाठी तिच्याकरिता वेगळे महामंडळ स्थापन होण्याची गरज आहे. त्यासाठी रेटा लावणे ही गोष्ट महापालिकेलाच करावी लागेल, कारण राज्य सरकारचे त्याकडे लक्षच नाही.

मुंबईच्या पाणीपुरवठ्यात भर घालण्यासाठी मध्य वैतरणा प्रकल्प आता हाती घेण्यात येत आहे. ऊर्ध्व वैतरणा प्रकल्पाचे पाणी पूवेर्कडे वळवून गोदावरी नदीच्या खोऱ्यात सोडावे अशी मागणी गेल्या २० वर्षांपासून चालू आहे. त्या खोऱ्यात नेहमीच पाण्याची तीव्र टंचाई असते हे लक्षात घेता, ती मागणी मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. ती मान्य झाल्यास मध्य वैतरणा प्रकल्प रद्द करावा लागेल. महाराष्ट्र पाणी परिषदेचे अध्यक्ष आणि माजी केंदीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील आणि औरंगाबादचे तरुण तुर्क कृष्णा डोणगावकर या प्रश्ान्ी पुढाकार घेऊन रान उठवतील हे निश्चित. जो प्रकल्प पुढे रद्दच होणार आहे, त्यामागे जाण्यात हशील काय? मुंबईकरिता आणखी पाणी उपलब्ध करण्यासाठी अन्य तीन-चार प्रकल्पांचे अंतिम आराखडे तयार आहेत. ते अमलात आणण्याचा विचार एकाही जाहीरनाम्यात नाही, ही खेदाची गोष्ट होय.

नजीकच्या भविष्यकाळात मुंबईवर एक नवे संकट येऊ घातले आहे. केंद सरकार लवकरच दुसरा राज्यपुनर्रचना आयोग नेमणार आहे. असा पहिला आयोग १९५३ साली नेमण्यात आला, तेव्हा मुंबई महानगराचे वेगळे राज्य व्हावे, अशी येथील बहुतेक साऱ्या बिगरमराठी मंडळींची इच्छा होती. त्यांचे खरेखुरे नेतृत्व इंडियन मर्चंट्स चेंबरकडे होते. त्या संस्थेची सध्या शतसंवत्सरी साजरी होत आहे. ती पुन्हा उचल खाणार नाही, याची हमी काय? या महापालिकेत मराठीऐवजी हिंदीचा वापर व्हावा अशी मागणी बिगरमराठी नगरसेवक सातत्याने करीत असतात. मुंबई महापालिकेच्या १९८५ सालच्या निवडणुकीत कमीत कमी मराठी व जास्तीत जास्त बिगरमराठी उमेदवार उभे करावे आणि काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर वेगळ्या राज्याचा ठराव करायचा असे मुंबई काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष मुरली देवरा यांनी गुप्तपणे योजले होते. महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हे लक्षात येताच त्यांनी योग्य ती पावले टाकली. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसचा पराभव झाला आणि या महापालिकेत शिवसेनेला प्रथमच बहुमत प्राप्त झाले. याबद्दल शिक्षा म्हणून वसंतदादांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागले, ही गोष्ट वेगळी! भारतातील दहा राज्ये लोकवस्तीने मुंबईहून लहान आहेत. तसेच, जगातील १९२ पैकी १२६ राष्ट्रे लोकवस्तीने मुंबईहून छोटी आहेत. जगात महानगरांची वेगळी राष्ट्रे व राज्ये असल्याची उदाहरणे आहेत. दुसऱ्या राज्यपुनर्रचना आयोगाकडे बिगरमराठी मंडळी या दिशेने युक्तिवाद करतील. मुंबईचे वेगळे राज्य व्हावे अशी कोणी मागणी केल्यास आपला तिला पाठिंबा राहणार नाही, असे सर्व पक्षांकडून- विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप यांच्याकडून आता जाहीर करून घेणे आवश्यक आहे.

मुंबईकरांनी सतर्क, दक्ष व जागरूक राहून, राजकीय पक्षांना आपल्या जाहीरनाम्यांमध्ये पुरवणी म्हणून वर सुचविलेल्या बाबी समाविष्ट करणे भाग पडले पाहिजे.