Showing posts with label Letter. Show all posts
Showing posts with label Letter. Show all posts

Monday, August 1, 2011

IFFCO Mystery

Letter in India Today

Since the very inception of Indian Farmers Fertilizer Cooperative Limited (IFFCO), it has been hoodwinking the ministries concerned on whether it’s a cooperative or a Public Sector Undertaking (PSU) (“Suicide Mystery and Corruption at IFFCO”, July 18). Eduardo Faleiro in 1993 decided to convert IFFCO into a PSU. But vested interests ensured that the proposition did not get implemented.

S M Gothoskar, Mumbai.


Friday, June 10, 2011

उद्योगांच्या पैशाचे स्रोत काय?

मुंबईत शिवाजी पार्क नाक्यावर शिवसेना भवनासमोर कोहिनूर मिल क्र. ३ ही कापड गिरणी होती. ती आजारी झाल्यावर केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्स्टाइल्स कॉर्पोरेशनने (एनटीसीने) ताब्यात घेतली. पुढे ती बंद पडल्यावर कालांतराने तिची जमीन एनटीसीने लिलावाने विकून टाकली. राज ठाकरे यांनी आपल्या कंपनीतर्फे दुसऱ्यांशी भागीदारी करून ४२१ कोटी रुपयांना ती खरेदी केली. त्यासाठी त्यांनी हा पैसा आणला कोठून, असा सवाल रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी केला आहे. तो तपासून पाहावयास हवा. राज ठाकरे राजकारणात असले तरी व्यवसायाने बिल्डर आहेत. आपला एक रुपयाही न घालता शेकडो कोटी रुपयांचे प्रकल्प उभे करणे या व्यवसायात शक्य असते. अर्थात राजकारण्यांनच नव्हे तर अनेक उद्योजकांना अशा प्रकारे उद्योगासाठी निधी उभारता येतो. व्यापारधंदा करण्यासाठी आपल्याकडे पैसे हवेत, असा गैरसमज मराठी लोकांचा असल्यामुळे या क्षेत्रात ते मागे पडले, असे गेल्या शतकातील एक बडे उद्योगपती लालचंद हिराचंद नेहमी म्हणत असत. ते आठवल्यांच्या कानावर कधी गेलेले नसावे. राज ठाकरे हे सर्वात मोठे मराठी बिल्डर नव्हेत. तो मान किशोर अवर्सेकरांकडे जातो. त्यांच्या युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची गेल्या ३१ मार्चअखेरच्या वर्षांत १७७२ कोटी रुपयांची विक्री झाली आणि प्राप्तिकर दिल्यावर तिला ९.६ कोटी रुपये निव्वळ नफा उरला. तिच्या दोन रुपये ‘पेडअप’ शेअरचा सध्या ७० रुपये भाव आहे. त्या कंपनीच्या शेअरभांडवलाचे बाजारभावाने एकूण मूल्य ५०० कोटी रुपयांहून अधिक आहे. या मोजपट्टीने पहिल्या १५ मराठी उद्योगपतींमध्ये अवर्सेकरांची गणना होते. राजकारणात शिरला आणि फार मोठा बिल्डर झाला, असे मुंबईतील उदाहरण म्हणजे मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांचे. प्रथम नगरसेवक व नंतर १६ वर्षे आमदार असा त्यांचा प्रवास आहे. १० वर्षांपूर्वी ते सामान्य बिल्डर होते. मग अचानक ते मुंबईतील सर्वात मोठे बिल्डर बनले. वरळीला ६३ मजली इमारत उभी करण्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला असल्यामुळे या क्षेत्रात ते विशेष तळपत आहेत. त्यासाठी त्यांनी पैसा आणला कोठून, असे आठवले विचारणार नाहीत. लोढा हे मारवाडी असल्यामुळे त्यांच्याकडे वडिलोपार्जित गडगंज पैसा असणार, असे आठवले गृहीत धरून चालतात. गडगंज पैसे येतात कसे हे यानिमित्ताने पाहू. इन्फोसिस या ख्यातनाम कंपनीने आपल्या समभागांची १९९३ मध्ये प्रथम विक्री केली. त्यांची २००६ पर्यंत दीड हजार पटीने मूल्यवृद्धी झाली. असे समजू की राज ठाकरे यांनी १९९३ मध्ये या कंपनीचे १० लाख रुपयांचे शेअर घेतले होते. त्यांचे २००६ पर्यंत मूल्यवृद्धी होऊन १५० कोटी रुपये झाले. कोहिनूरची जमीन खरेदी करण्याकरिता बँकांकडून कर्ज घेण्यासाठी ही रक्कम दुरावा (मार्जिन मनी) म्हणून पुरेशी होती.


तथापि, आपल्या खासगी धंद्यासाठी असा खुलासा देण्याचे राज ठाकरे यांच्यावर मुळीच बंधन नाही. आर्थिक जगतात अल्पावधीत प्रचंड मूल्यवृद्धी झाली, अशी कित्येक उदाहरणे आहेत. या गोष्टी आठवल्यांच्या गावी दिसत नाहीत. (दरम्यान राज ठाकरे यांनी कोहिनूर प्रकल्पातून अंग काढून घेतल्यामुळे ही बाब उपस्थित करण्याचे खरोखर प्रयोजन नव्हते.) २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीवेळी नीरा राडिया यांनी काही विशेष माहिती सांगितली. बडय़ा कंपन्यांची दिल्ली दरबारातील मोठी कामे करून देणे, हा या बाईंचा धंदा आहे. डीबी रिअ‍ॅलिटी ही कंपनी शरद पवारांची असल्याचा सर्वत्र समज आहे असे त्या चौकशीवेळी म्हणाल्या. युनिटी इन्फ्रा ही कंपनी ठाकरे पितापुत्रांची किंवा लोढा ग्रुप महाजन मंडळींची आहे, असा समज असल्याचे नीराबाई म्हणालेल्या नाहीत, हे महत्त्वाचे आहे.


शां. मं. गोठोसकर, वडाळा, मुंबई


Wednesday, February 23, 2011

अजितदादांच्या टगेगिरीचा शोध!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात खुद्द स्वत:बद्दल टग्या हा शब्द वापरल्यामुळे सर्वजण अचंबित झाले आहेत. या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी मराठी-मराठी व मराठी-इंग्रजी असे कित्येक शब्दकोश पाहिले. त्यांमध्ये नमूद केलेले अर्थ असे- उनाड, गुंड, धटिंगण, लबाड, लुच्चा, भामटा व छट, इंग्रजी अर्थ असे- deceit, a huge burly fellow, rogue, rascal व scamp. हे अर्थ ठाऊक असते तर अजितदादांनी हा शब्द वापरला नसता हे उघड आहे. तथापि, फक्त एका शब्दकोशातील अनेक अर्थांपैकी एक आहे, ‘निर्भय म्होरक्या’ intrepid leader! तो अजितदादांना फिट्ट बसतो काय?

शां. मं. गोठोसकर, वडाळा, मुंबई

Monday, June 22, 2009

"In the Name of Religion" - Letter in India Today

To address Muslims, the UPA must not just make empty promises. It must give them fair representation in the Government and a role in decision-making instead.

S.M. Gothoskar, Mumbai

Click here to read this letter on India Today Website

Saturday, February 21, 2009

उडिपी हे तुळूभाषक, कन्नड नव्हेत!

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून उभय राज्यांमध्ये वातावरण संतप्त असून जाळपोळ व तोडफोड चालू आहे. तीस वर्षांपूर्वी अशीच तंग स्थिती निर्माण झाली तेव्हा महाराष्ट्रात शिवसैनिकांनी उडिपी हॉटेलांवर हल्ले केले होते. त्या हॉटेलांचे मालक कन्नड आहे, असे त्यांनी गृहीत धरले होते, पण ते खरे नव्हे.

महाराष्ट्रात ज्यांना उडिपी म्हणून ओळखले जाते त्यांची मातृभाषा तुळू असून ती कोणत्याही भाषेची बोलभाषा नाही. तिला स्वतंत्र असा मोठा सांस्कृतिक वारसा आहे. ऐश्वर्या राय व शिल्पा शेट्टी या अभिनेत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांची ही मातृभाषा आहे. मुंबईतील एकूण ३४ विधानसभा सदस्यांपैकी तिघे शेष्ी असून ते तुळूभाषिक आहेत. कर्नाटकाचे दक्षिण कन्नड व उडिपी जिल्हे (कुंदापूर तालुका वगळून) यांमध्ये तुळू लोक मोठय़ा बहुसंख्येने आहेत. तो प्रदेश तुळूनाड म्हणून ओळखला जातो.

राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात तुळूचा समावेश नसला तरी त्यातील चार-पाच भाषांपेक्षा तुळू अधिक प्रगत आहे. तुळूमध्ये कथाकादंबऱ्या व मासिके प्रसिद्ध होतात. तुळू साहित्य अकादमी नावाची बिनसरकारी संस्था कार्यरत आहे. हे पाहता तिचा आठव्या परिशिष्टात समावेश व्हायला हवा. तथापि, तुळू मंडळीच यासाठी आग्रही नाहीत असे दिसते.

तुळूनाड हे वेगळे राज्य झाले तर क्षेत्रफळ व लोकसंख्या यांबाबत ते गोव्याच्या दुपटीहून मोठे होईल.उडिपी हॉटेल चालविणारे हे कन्नड नाहीत हे यावरून लक्षात येईल. खरे म्हणजे त्यांच्या महाराष्ट्रातील- विशेषत: मुंबईतील- संस्थांनी हे जाहीरपणे सांगायला हवे. तसे केले तर कन्नड वेदिकेचे लोक कर्नाटकात तुळू भाषकांवर हल्ले करतील अशी त्यांना भीती वाटत असावी.

शां. मं. गोठोसकर, वडाळा, मुंबई
Click here to read this letter on Loksatta.com

Monday, November 24, 2008

Goon Agenda - Letter in India Today

The genesis of the Raj Thackeray phenomenon is sub-nationalism and not regional or parochial chauvinism. The non-Hindi states in India are virtual sub-nations while Hindi states are quasi-sub-nations. When Maharashtra was formed in 1960, the Gujaratis were the largest among the linguistic minorities. Over the years, this status has been acquired by the Hindispeaking community. Hindi leaders in Mumbai are bent upon destabilising the sub-nation called Maharashtra. India’s think tank should first accept the ground reality of subnationalism and then try to find solutions for it.

S.M. Gothoskar, Mumbai

Tuesday, October 7, 2008

'मनसे'ला बाजू मांडण्याची संधी न देताच 'न्याय'

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व तिचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दहशतवादी अशी संभावना हायकोर्टाने केली आहे. कोणी पुढारी दहशत माजवतो तसा दहशतवाद न्यायालयाला अभिप्रेत नसून स्फोट घडवून आणणारे दहशतवादी या संभावनेसाठी गृहीत धरले आहेत. अशा दहशहतवादी संघटना नोंदलेल्या नसतात. तसेच, त्यांना ठावठिकाणा नसतो. संशयिताला दहशतवादी म्हणून अटक केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा शाबित झाला तरच तो दहशतवादी ठरतो. मनसेबाबत तसे नाही. ती संघटना राजकीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडे नोंदलेली असून पदाधिकाऱ्यांची नावे व पत्ते त्या कार्यालयाकडे दिलेले आहेत. मनसेच्या आंदोलनाबाबत संबंधित दुकानदार संघटना हायकोर्टामध्ये गेल्यानंतर नेहमीची कार्यपद्धती बाजूला ठेवून हा अर्ज हाताळण्यात आला असे दिसते. न्यायालयाच्या पद्धतीनुसार, मनसेला प्रतिवादी म्हणून अर्जात प्रथम नमूद करा असा आदेश देणे आवश्यक होते. तसेच, आधी मराठी पाट्या लावा किंवा तशा पाट्या तयार करून त्या न्यायालयात जमा करा आणि मग काय ते बोला असे त्यांना सांगणे न्यायालयीन कार्यपद्धतीनुसार उचित ठरले असते. तसे काही न केल्यामुळे आणि मनसेला आपले म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध न करता म्हणजेच या पक्षाला नॅचरल जस्टीस न देता न्यायालयाने त्या पक्षाची संभावना केली.

- शां. मं. गोठोसकर, वडाळा.

Tuesday, September 16, 2008

शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण?

महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळेल असे प्रताप आसबे यांनी 'पंतांचा वातकुक् कुट'मध्ये (मटा. ९ सप्टेंबर) म्हटले आहे. तसे घडल्यावर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद नको असल्यास मनोहर जोशी एवढाच शिवसेनेत पर्याय आहे असे आसबे म्हणतात. पुढच्या वषीर् जोशी सर पुन्हा मुख्यमंत्री झाले तर त्यावेळी त्यांचे वय ७२ वर्षांचे असेल. महाराष्ट्रात आतापर्यंत १४ मुख्यमंत्री झाले. त्यापैकी कोणीही त्याच्या ७२व्या वषीर् या पदावर नव्हता. पासष्टाव्या वषीर् निवृत्तीचा दंडक शिवसेनाप्रमुखांनी अलीकडेच तर जाहीर केला होता. दुसरे म्हणजे सरांच्या नावावर चार वर्षांपूवीर्च फुली मारलेली आहे. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीवेळी त्यांच्याविरुद्ध उभे राहायला कोणी काँग्रेसजन तयार नव्हता. मग मुंबई काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष गुरुदास कामत यांनी एकनाथ गायकवाड यांना सरांविरुद्ध उभे केले. आपणाला पाडण्याचा निर्णय झाला आहे हे मतदानाला केवळ दोन दिवस असताना सरांच्या लक्षात आले. त्या पराभवानंतर सरांना वळचणीला टाकले जाणार होते, पण तेवढ्यात नारायण राणे शिवसेना सोडून गेल्यामुळे सरांवर तशी परिस्थिती ओढवली नाही. त्या पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी अनंत गीते यांचा विचार होऊ शकतो. ते केंदीय कॅबिनेट मंत्री होते. ते मुख्यमंत्री झाले तर रत्नागिरी जिल्ह्यात नारायण राणे यांच्या राजकारणाला मोठा शह बसेल. गीतेंचा विचार न झाल्यास माजी केंदीय मंत्री सुरेश प्रभू व सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर या पदासाठी तयार आहेत.

- शां. मं. गोठोसकर, वडाळा.

Friday, November 23, 2007

मग परदेशी महिलांना प्रवेश कसा?

गोव्यातील मंगेशीच्या मंदिरात काही पर्यटक आपली पादत्राणे हातातील पिशवीत दडवून मंदिरात शिरतात त्याचे काय? केरळमधील साबरीमलाच्या अय्यप्पा मंदिरात ११ ते ५५ वयोगटातील स्त्रियांना प्रवेश मिळत नाही. रजस्वला स्त्रीने मंदिरात येऊ नये यासाठी हा नियम आहे. याउलट मंगेशीच्या मंदिरात स्त्रिया, वयात आलेल्या विद्याथिर्नींचे थवेच्या थवे सहल म्हणून येतात. तसेच गौरवणीर्य परदेशी पर्यटक महिलांसुद्धा मोठ्या संख्येने येथे भेट देतात. यात काही रजस्वला असणे शक्य आहे. मूतिर्पूजा पाहण्यासाठी गोमांस भक्षण करून आलेली विदेशी, गौरवणीर्य व परधमीर्य महिला हातात चामड्याच्या पट्ट्याचे घड्याळ व कमरेला चामड्याचा पट्टा बांधून आणि हातात चामड्याची पर्स घेऊन मंगेशीच्या मंदिरात शिरू शकते; पण भक्तिभावाने श्री मंगेशाच्या दर्शनाला जाऊ इच्छिणाऱ्या अपंगांना प्रवेश नाकारला जातो, याला काय म्हणावे?

शां. मं. गोठोसकर, वडाळा.

Wednesday, February 28, 2007

शामलाल यांना गुगली!

' टाइम्स ऑफ इंडिया'चे भूतपूर्व संपादक शामलाल यांचे नुकतेच निधन झाले. या दैनिकात त्यांचे 'लाइफ अँड लेटर्स' हे साप्ताहिक सदर बुधवारी प्रसिद्ध होत असे. जगात नव्याने विशेष गाजत असलेल्या साहित्यकृतींचे परीक्षण त्या सदरात येत असे. देशाबाहेर महत्त्वाचे काही चालले असल्यास ते भारतवासीयांना प्रथम समजावून देण्याचा अधिकार आपलाच आहे असे ते समजत. त्यांना एका पत्रकाराने यशस्वी गुगली टाकली त्याची ही गोष्ट. बोरिस पास्तरनाक या ख्यातनाम रशियन लेखकाची डॉ. झिवागो या आत्मचरित्रात्मक नोबेल विजेत्या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाच्या प्रती मुंबईत स्टँड बुक स्टॉलमध्ये पोचल्या. त्यावेळी 'इंडियन एक्सप्रेस'मधील एक पत्रकार मोहन राव तेथे उपस्थित होते. तो शनिवार होता. आलेल्या प्रतींपैकी 'टाइम्स' व 'एक्सप्रेस' यांना एकेक द्यायची होती. 'लाइफ अँड लेटर्स'सारखे ग्रंथ समीक्षणाचे राव यांचे सदर शुक्रवारी 'एक्सप्रेस'मध्ये प्रसिद्ध होत असे. डॉ. झिवागोची प्रत 'टाइम्स'मध्ये सोमवारी दिली, तर त्यावर बुधवारच्या अंकात शामलाल लिहिणार हे उघड होते. यास्तव, दोन्ही दैनिकांना गुरुवारी प्रती द्या, अशी विनंती राव यांनी बुक स्टॉलचे मालक शानभाग यांना केली. ते व राव दोघे कोकणी असल्यामुळे त्यांचे सख्य होते. मग राव यांनी एक प्रत घरी नेली आणि सोमवारी परत आणून दिली. पुढे शानभागांनी त्या प्रती गुरुवारी दोन्ही दैनिकांना पाठवून दिल्या. दुसऱ्या दिवशी शामलाल पाहतात तर 'एक्सप्रेस'मध्ये डॉ. झिवागोवर समीक्षण प्रसिद्ध झाले होते. त्यांना संताप अनावर झाला. त्यांनी शानभाग व 'एक्सप्रेस'चे त्यावेळचे संपादक फ्रँक मोराइस यांच्याकडे चौकशी केली असता, त्या प्रती गुरुवारीच वाटण्यात आल्या होत्या, याबद्दल त्यांची खात्री झाली. त्याचबरोबर मोहन राव यांनी चांगलीच कुरघोडी केली हेसुद्धा त्यांच्या लक्षात आले.
शां. मं. गोठोसकर, वडाळा.
Click here to read this letter on Maharashtratimes.com

Tuesday, December 26, 2006

शालिनीताईंचा 'सुसंस्कृत'पणा!

खैरलांजीत दलित हत्याकांडात मरण पावलेल्या स्त्रियांच्या चारित्र्याबद्दल शालिनीताई पाटील यांनी शंका व्यक्त केली आहे. याबाबत पूवीर्ची एक आठवण अप्रस्तुत ठरणार नाही. लोकसभेच्या १९८० साली झालेल्या निवडणुकीत सातारा मतदारसंघात यशवंतराव चव्हाण काँग्रेस(एस)चे तर शालिनीताई काँग्रेस(आय)च्या उमेदवार होत्या. त्यावेळी मुंबईतील तेव्हाच्या समाजवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेने शालिनीताईंच्या चारित्र्याबद्दल शंका व्यक्त केली होती. त्यावर शालिनीताई म्हणाल्या, 'स्त्रीच्या चारित्र्याविरुद्ध बोलणे हे असंस्कृतपणाचे लक्षण आहे, असे समाजात मानले जाते.' आता पंचाहत्तरीला पोचलेल्या शालिनीताईंना वयोपरत्वे याचे विस्मरण झाले आहे की फक्त सवर्ण स्त्रीच्या चारित्र्याविरुद्ध बोलणे हा असंस्कृतपणा आहे, असे त्यांना मुळात म्हणायचे होते?

शां. मं. गोठोसकर, वडाळा.

Tuesday, August 29, 2006

साईबाबांचे सिंहासन सरकारी निर्णयाशी सुसंगतच

साईबाबांच्या सोन्याच्या सिंहासनावर झालेल्या वादानंतर ते न बनवण्याचा शिडीर् संस्थानच्या कार्यकारिणीने घेतला असला, तरी मूळ निर्णय यापूवीर्च्या सरकारी निर्णयाशी सुसंगतच आहे. या संस्थानासाठी सरकारने चालू दशकाच्या आरंभी वेगळा कायदा केला. त्याच्या विधेयकात साईबाबा हे देवता आहेत, असे म्हटले होते. साईबाबांना पाहिलेले लोक अजून हयात आहेत. मग ते देवता कसे? त्यांच्या समाधीवर वास्तू बांधली व ते त्यांचे स्मृतीस्थळ आहे, असे विधेयक तयार करण्यापूवीर्च्या कागदपत्रांमध्ये नमूद होते. असे असता ती इमारत मंदिर कशी होऊ शकते? हे सर्व त्या विधेयकाने केले आहे. साईबाबांना देवता ठरवून मंदिरात बसविणे या सरकारच्या कर्तृत्वाशी सुसंगत असाच हा सोन्याच्या सिंहासनाचा निर्णय होता. तो कायद्याला धरून होता की नाही याबाबत दोन्ही बाजूंनी मत देता येईल, अशी त्यामध्ये शब्दयोजना आहे.

शां. मं. गोठोसकर, मुंबई.

Sunday, August 20, 2006

पवारांची मुलगी हेच क्वालिफिकेशन!

'सुप्रिया मुख्यमंत्री होतील काय?' या शां. मं. गोठोस्कर यांच्या लेखात त्या शरद पवार यांच्या कन्या आहेत म्हटल्यावर त्यांना या पदासाठी लागणाऱ्या कोणत्याच गुणांची गरज नाही, असे गृहीत धरले आहे. नाही म्हणायला लेखाच्या शेवटी 'येत्या तीन वर्षांत त्यांनी किमान आवश्यक एवढी तयारी केली पाहिजे' असे म्हटलेले आहे. त्यांनी राजकारणाला आवश्यक तो पेहराव स्वीकारला आहे एवढेच क्वालिफिकेशन लेखकाने सांगितले आहे. पण राजकारणातील अनुभव, राजकीय जाण, परिपक्वता याबाबत मौन पाळले आहे. संपूर्ण लेखाचा रोखच असा आहे की, जणू जनतेने महाराष्ट्र राज्य पवार घराण्याला आंदण देऊन टाकले आहे. निवडणुकीला अद्याप तीन वषेर् बाकी असताना जनतेला गृहीत धरून मुख्यमंत्र्यांचे नाव मुक्रर करून टाकणे हा जनतेचा उपमर्द आहे.

रजनीकांत शेट्ये, अंधेरी

Sunday, February 29, 2004

शंकरराव चव्हाण आणि विस्थापित

कै. शंकरराव चव्हाण यांच्यासंबंधी 35 वर्षांपूवीर्ची ही आठवण. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यात तिळारी नदीवर प्रचंड धरण बांधण्याचा संकल्प राज्य सरकारने जाहीर केला होता. मी त्याचा प्रकल्प अहवाल मिळवून अभ्यास केला. पानशेतच्या साडेतीनपट एवढ्या जलाशयाचे ते धरण परमे गावी बांधायचे होते. आणि नऊ हजार लोक विस्थापित होणार होते. हा प्रकल्प अहवाल केंदीय जल व वीज आयोगाने तांत्रिक छाननी करून मंजूर केला होता. तथापि , या अहवालात मला काही ढोबळ तांत्रिक चुका आढळून आल्या. परमेऐवजी आयनोडे गावी धरण बांधले , तरीही पाणी तेवढेच साठविता येईल आणि फक्त तीन हजार लोकांना विस्थापित व्हावे लागेल , असे माझ्या लक्षात आले. मी त्याप्रमाणे लिहिलेला लेख प्रसिद्ध होताच शंकररावांनी त्याची तत्काळ दखल घेऊन , त्या बाबीची चौकशी केली. माझे आक्षेप खरे आहेत , हे लक्षात येताच आयनोडे येथे धरण बांधण्याचे आराखडे तयार करण्याचे त्यांनी आदेश दिले. त्याप्रमाणे नंतर धरण तयार झाले. अशा प्रकारे विस्थापित होण्यापासून त्यांनी सहा हजार लोकांना वाचविले.

याउलट आताचे राज्यकर्ते. भीमेवरील उजनी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असून गेली तीन-चार वषेर् पाण्याचा तुटवडा आहे. आषाढी-कातिर्कीलासुद्धा चंदभागा वाहत नाही. टाटा पॉवर कंपनीच्या तिन्ही जलविद्युत प्रकल्पांची धरणे घाटमाथ्यावर असून ती सर्व भीमेच्या उपनद्यांवर आहेत. या वीजकेंदाचे लोड फॅक्टर 50 टक्क्यांऐवजी 19 टक्के केला , तर कंपनीचे काहीच बिघडणार नाही आणि त्यामुळे वाचलेले 25 टीएमसी पाणी उजनीला मिळून तुटवड्याचा प्रश्ान् सुटेल , अशा आशयाचा माझा लेख एक वर्षापूवीर् प्रसिद्ध झाला. त्याआधी ही बाब मी राज्यर्कत्यांना कळविली. पण त्याकडे लक्ष दिले गेले नाही. दुष्काळग्रस्तांचे होरपळणे चालू आहे.

शां. मं. गोठोसकर , मुंबई.
Click on this link to read this letter on Maharashtratimes.com