Wednesday, July 11, 2007

शेखावतांच्या तुलनेत प्रतिभाताई हे कमी संकट!

शां. मं. गोठोसकर

काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांच्यावर दबाव आणण्यासाठी भैराँसिंह आपली संपत्ती जाहीर करणार आहेत, असे भाजपने जाहीर केले आहे. मग शैक्षणिक पात्रता किती, हेही सांगण्याचा आग्रह भाजप का धरीत नाही?

आपल्या देशात सरकारी व निमसरकारी कार्यालयांमध्ये चपराशाच्या नोकरीसाठी किमान शैक्षणिक पात्रता एसएससी आहे. तथापि, जेमतेम आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या एका इच्छुकाने चक्क राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याचे नाव आहे भैराँसिंह शेखावत! या पदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ते 'अपक्ष' उमेदवार आहेत.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जावर इच्छुकाची संपत्ती नमूद केली पाहिजे अशी अट अलीकडच्या काळात घालण्यात आली. कालांतराने, शैक्षणिक पात्रतासुद्धा लिहिली पाहिजे, अशी शर्त जोडण्यात आली. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांच्यावर दबाव आणण्यासाठी भैराँसिंह आपली संपत्ती जाहीर करणार आहेत, असे भाजपने जाहीर केले आहे. मग शैक्षणिक पात्रता किती हे सांगण्याचा आग्रह भाजप का धरीत नाही? प्रतिभाताई अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांच्या एम. ए. असून त्यांच्याकडे कायद्याचीही पदवी आहे. राष्ट्रपतीपदासाठी किमान शैक्षणिक पात्रता किती हे नेमून दिलेले नसले तरी प्रतिभाताईंकडे किमान आवश्यक त्याहून ती अधिक आहे आणि भैराँसिंहांकडे तर मुळीच नाही हे यावरून लक्षात येते.

भैराँसिंहंाची अन्य पात्रताही येथे तपासणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजस्थानातील जयपूर संस्थानात सिकर हे उपसंस्थान होते. तेथे १९४५ साली भैराँसिंहांची पोलिस सबइन्स्पेक्टर म्हणून नेमणूक झाली. बाहेरून येणाऱ्या मिठावर सिकरचे सरकार कर आकारत असे. पोलिसांनी तो गोळा करायचा आणि सरकारी तिजोरीत भरायचा अशी पद्धत होती. सिकरचा रावराजा कल्याणसिंह एकदा रस्त्यावरून जात असताना उंटावरून मीठ नेणारा काफिला त्याला दिसला. कर भरल्याच्या पावत्या दाखवा, असे त्याने फर्मावले. ते मीठ व्यापारी म्हणाले, आम्ही कर भरला, पण पावत्या देण्यात आल्या नाहीत. यावर भैराँसिंहांना तात्काळ बडतर्फ करण्यात आले. ही गोष्ट त्यावेळच्या जयपूरच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती.

सिकर येथे राधामोहन माथूर नावाचे एक बडे सरकारी अधिकारी होते. बडतफीर्नंतर भैराँसिंह त्यांच्या वाड्यावर राहत असत. पाच-सहा महिन्यांनंतर राधामोहन रावराजांना भेटले आणि भैराँसिंहांना परत नोकरीवर घेण्याची विनंती केली. भ्रष्ट माणसाबद्दल असे सांगणेसुद्धा तुम्हाला शोभत नाही, असे रावराजा म्हणाले. त्यावर राधामोहन उत्तरले, ''बडतर्फ झाल्यापासून मीच त्याला पोसत आहे. त्याला पुन्हा कामावर घेतला, तर माझ्यावरचा भार कमी होईल.'' त्यावर भैराँसिंहांना परत नोकरीवर घेण्यात आले, पण त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली. एक वर्षानंतर त्यांनी राजीनामा दिला.

राधामोहन यांचे धाकटे भाऊ ब्रजमोहन हे पूर्वी मुंबईत 'टाइम्स ऑफ इंडिया'त नोकरीला होते. पुढे ते संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफ संघटनेत काम करायचे. निवृत्तीनंतर ते सिकरला आपल्या वाड्यात राहतात. अलीकडेच एका इंग्रजी साप्ताहिकाचे प्रतिनिधी नीलम मिश्रा हे नुकतेच त्यांना भेटले. ब्रजमोहननी हे सारे मिश्रांना सांगितले. ते म्हणाले, ''जेव्हा भैराँसिंहांचा उल्लेख होत असे, तेव्हा प्रत्येक वेळी राधामोहन ही सारी कथा पुन्हा सांगत असत.''

हे सारे खोटे आहे, असे काहीसुद्धा झालेले नाही, असे भाजप नेत्या सुषमा स्वराज निक्षून सांगत असतात. तेथील डीएसपीने दिलेल्या पत्राचा त्या हवाला देतात. तसे ते असेलही, पण रावराजाने बडतफीर्च्या हुकुमावर कारण लिहिले पाहिजे, असे त्यांच्यावर आत्तासारखे मुळीच बंधन नव्हते. नोकरीत खंड पडला होता, हे त्या डीएसपीने नाकारलेले नाही. महात्मा गांधी व भैराँसिंह यांच्यामध्ये साम्य एवढेच की दोघांनीही मिठावरचा कर भरलाच नाही. फरक एवढाच की गांधीजींनी तो दिलाच नाही आणि भैराँसिंहांनी मिळालेला कर सरकारी तिजोरीत न भरता तो आपल्या खिशात घातला!

भैराँसिंहांचे जावई नरपतसिंह राजवी राजस्थानात एक मंत्री आहेत. त्यांचे वडील तहसिलदार होते. राजस्थान कॅनाल (म्हणजेच इंदिरा गांधी कॅनाल) या अतिप्रचंड कालव्यासाठी सरकारला बरीच जमीन ताब्यात घ्यायची होती. त्यातील काही जमीन या तहसिलदारांनी सरकारी कागदपत्रात आपल्या मुलाच्या नावाने दाखवली. त्यासाठी खोडाखोड केली. मुलाच्या जन्माच्या दोन वषेर् आधीपासून ती जमीन त्याच्या नावावर होती असे आढळून आले! ती जमीन सरकारने घेतल्याबद्दल नरपतसिंहाला मोठी नुकसानभरपाई मिळाली. यावर मोठा गहजब झाला. महसूल खात्याने केलेल्या चौकशीत हे सारे उघड झाले. त्यावर राजस्थान विधानसभेत प्रश्ान् विचारला असता, या प्रकरणाची सीबीआयने चौकशी केली असून, त्यांना त्यात काही तथ्य आढळून आले नाही, असे भैराँसिंहांनी सांगितले. तथापि सीबीआयकडून चौकशी करून घ्या, असे राजस्थान सरकारने केंद सरकारला कळविलेच नव्हते, असे त्यावेळच्या संबंधित केंदीय मंत्री मार्गारेट अल्वा यांनी कळविले.

भैराँसिंह व जावई नरपतसिंह यांची आणखी एक कमाल सांगितली पाहिजे. राजस्थानात अलवार येथे शालिनी शर्मा नावाच्या भाजपच्या पुढारी होत्या. त्या व त्यांचे पती एक शाळा चालवत असत. तेथील एका शिक्षिकेला भाजपचे काही मंत्री व प्रमुख आमदार यांच्याशी शय्यासोबत करायला या शर्मा दाम्पत्याने भाग पाडले. त्यानंतर राजस्थान समाज कल्याण मंडळाच्या उपाध्यक्षपदी शालिनीबाईंची नेमणूक झाली. त्यासाठी भैराँसिंह व जावई यांनी पुढाकार घेतला होता, असे त्यावेळी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले होते. पुढे या शिक्षिकाप्रकरणी शर्मा पतिपत्नीवर खटला होऊन, न्यायालयाने त्यांची रवानगी तुरुंगात केली.

गेल्या काही दिवसात प्रतिभाताईंवर अनेक आरोप झाले. ते संकलित करून माजी केंदीय मंत्री अरुण शौरी यांनी त्यावर एक पुस्तिकाच लिहिली आहे. प्रतिभा महिला सहकारी बँकेबाबत रिझर्व बँकेचा एक अहवाल आहे. तसेच, कर्मचारी संघटनेचे सविस्तर निवेदन आहे. या निवेदनातील काही भाग हा रिझर्व बँकेचा अहवाल म्हणून शौरींनी दाखविला असे आता उजेडात आले आहे. प्रतिभाताईंच्या तीन नातेवाईकांना दिलेली कजेर् बुडाली असा आरोप आहे. या तीनपैकी एक नातेवाईक नव्हता. त्या तिघांनी ती कजेर् सव्याज परत केली. त्यांना नियमानुसार फक्त दंडात्मक व्याज माफ करण्यात आले; तरीही या आरोपांचा पुनरुच्चार चालूच आहे.

प्रतिभाताईंनी संत मुक्ताबाई सहकारी साखर कारखाना स्थापन केला. त्यासाठी घेतलेली कजेर् व त्यावरील व्याज यापैकी काहीसुद्धा चुकते केले नाही. पुढे तो कारखाना बंदच पडला आणि आता तर बँकेने तो जप्त केला आहे. अशा कर्जांना राज्य सरकारची हमी असते. माजी सहकारमंत्री आणि राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव गिरीधर पाटील यांनी धुळे जिल्ह्यात शिरपूर सहकारी साखर कारखाना स्थापन केला. त्याने घेतलेली कजेर् व त्यावरील व्याज यांची राज्य सरकारने हमीप्रमाणे फेड केली. पुढे राज्य सरकारने त्या रकमांची त्या कारखान्याकडून वसुली केलीच नाही. आता चित्र असे की प्रतिभाताई मोठ्या थकबाकीदार आणि शिवाजीराव मात्र मुळीच तसे नाहीत.

भारताच्या राष्ट्रपतीला उत्स्फूर्त इंग्रजी भाषण करता आले पाहिजे. प्रतिभाताईंना ते येते, भैराँसिंहांना नाही. राष्ट्रपती होणाऱ्याला जग व भारत यापुढील अतिमहत्त्वाच्या प्रश्नंाची जाण हवी. यासंबंधात दोन्ही उमेदवारांबाबत आनंद आहे. तरी या दोन उमेदवारांमध्ये प्रतिभाताई हे कमी संकट आहे, हे वरील सर्व विवेचनावरून लक्षात येईल.

No comments:

Post a Comment