Sunday, February 29, 2004

शंकरराव चव्हाण आणि विस्थापित

कै. शंकरराव चव्हाण यांच्यासंबंधी 35 वर्षांपूवीर्ची ही आठवण. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यात तिळारी नदीवर प्रचंड धरण बांधण्याचा संकल्प राज्य सरकारने जाहीर केला होता. मी त्याचा प्रकल्प अहवाल मिळवून अभ्यास केला. पानशेतच्या साडेतीनपट एवढ्या जलाशयाचे ते धरण परमे गावी बांधायचे होते. आणि नऊ हजार लोक विस्थापित होणार होते. हा प्रकल्प अहवाल केंदीय जल व वीज आयोगाने तांत्रिक छाननी करून मंजूर केला होता. तथापि , या अहवालात मला काही ढोबळ तांत्रिक चुका आढळून आल्या. परमेऐवजी आयनोडे गावी धरण बांधले , तरीही पाणी तेवढेच साठविता येईल आणि फक्त तीन हजार लोकांना विस्थापित व्हावे लागेल , असे माझ्या लक्षात आले. मी त्याप्रमाणे लिहिलेला लेख प्रसिद्ध होताच शंकररावांनी त्याची तत्काळ दखल घेऊन , त्या बाबीची चौकशी केली. माझे आक्षेप खरे आहेत , हे लक्षात येताच आयनोडे येथे धरण बांधण्याचे आराखडे तयार करण्याचे त्यांनी आदेश दिले. त्याप्रमाणे नंतर धरण तयार झाले. अशा प्रकारे विस्थापित होण्यापासून त्यांनी सहा हजार लोकांना वाचविले.

याउलट आताचे राज्यकर्ते. भीमेवरील उजनी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असून गेली तीन-चार वषेर् पाण्याचा तुटवडा आहे. आषाढी-कातिर्कीलासुद्धा चंदभागा वाहत नाही. टाटा पॉवर कंपनीच्या तिन्ही जलविद्युत प्रकल्पांची धरणे घाटमाथ्यावर असून ती सर्व भीमेच्या उपनद्यांवर आहेत. या वीजकेंदाचे लोड फॅक्टर 50 टक्क्यांऐवजी 19 टक्के केला , तर कंपनीचे काहीच बिघडणार नाही आणि त्यामुळे वाचलेले 25 टीएमसी पाणी उजनीला मिळून तुटवड्याचा प्रश्ान् सुटेल , अशा आशयाचा माझा लेख एक वर्षापूवीर् प्रसिद्ध झाला. त्याआधी ही बाब मी राज्यर्कत्यांना कळविली. पण त्याकडे लक्ष दिले गेले नाही. दुष्काळग्रस्तांचे होरपळणे चालू आहे.

शां. मं. गोठोसकर , मुंबई.
Click on this link to read this letter on Maharashtratimes.com

No comments:

Post a Comment